बाई
बाई
पूर्वी लोक म्हणायचे
बाई घराची लक्ष्मी असते
एकत्र कुटंबात सुद्धा
वेगळे रहात नव्हते
बाई होती एक आदर
वस्र होती अंगभर
मोठ्यांचा मान राखून
डोक्यावर घेत होती पदर
खानदानी म्हणून आईबापाची
लेक सासरी नांदत होती
थोड्या गोष्टीसाठी कधीही
वाईट सांगत नव्हती
बाप मुलीचे भिकार लाड
कधीच पुरवत नव्ह्ता
सासरीच नांदावे मुलीने
आग्रह धरत होता
जेष्ठ लोकांचे शब्द तो
कधीच मोडत नव्ह्ता
दिलेला शब्द बैठकीतला
आयुष्यभर पाळत होता
बापाच्या धाकाने मुलगी
सासरी नांदत होती
मुलाबाळांचा सुखी संसार
सासरी करत होती
आई बाप सुखी समाधानी
चिंता भविष्याची नव्हती
फाटक्या संसाराला मुलीच्या
हातभार लावत होती
सासू सासरे आई वडील
हे संस्कार शिकवत होते
खोटे गार्हाने केल्यास
तिलाच मारत होते
त्यामुळे घटस्फोट दुर्मिळ
कुठे एखादाच दिसे
आता सुशिक्षित पिढीत
विचाराचा ताळमेळ नसे
मुली अगोदर आई वडील
आग्रही दिसतात
मुलीला समजून सांगण्याऐवजी
आपल्या घरी आणतात
एकट्या मुलीच्या सुखासाठी
सासू सासरे बेवारस होतात
नवरा बायको त्यांची मुले
हाच संसार समजतात
यातून झाले विभक्त कुटुंब
माया आजी,आजोबाची सरली
तिच नातवंडे मोठी होऊन
आई वडीलांना विसरली
संस्कार,संस्कृती पैश्यातून
कधीच मिळत नाही,
आजी,आजोबांचे प्रेम अनमोल
बाजारात मिळत नाही
विभक्त कुटूंब संसारात
डोकेदु:खी ठरली
भांडणे, कलह, वाद होऊन
घटस्फोटाला कारणे मिळाली