आयुष्याचं गणित
आयुष्याचं गणित
आयुष्याचं गणित
कधी सुटलंय कोणाला ?
पण ते सोडवण्याच्या प्रयत्नात
कित्येक वर्ष लावली पणाला
कधी दुष्काळी उन्हाळा
कधी महापुराचा पावसाळा
तर कधी गुलाबी थंडीत पटकन संपणारा हिवाळा
सुख-दुःख, राग-लोभ, चढ-उतार हे जीवनातले महत्त्वाचे घटक
ऋतूंच आणि आयुष्यात चक्र सतत असच चालू असतं
थांबतो फक्त तो माणूस
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात
विचार करतो त्यावेळी
काय मिळवलं काय गमावलं ?
आणि लक्षात येतं ....
मिळवलं गमावलेलं सर्व टाकून मला
जायचं आहे समोर स्वतःच्याच निवाड्याला....।