आरसा
आरसा
चेहरा कितीही सुंदर असला
तरी आरसा खोट बोलत नाही
तुम्ही आपल्याशी आणि आपल्यांशी
किती प्रामाणिक आहात
याचे एकदा आत्मपरीक्षण झाले पाहीजे
किणीही लपवले तरी सत्याच्याआड खोटं
जास्त दिवस लपून राहत नाही
एकदिवस ते उजेडात येतेच
खोटी सहानुभूती आणि खोटं प्रेम
करणारी व्यक्ती विश्वासू कधीच नसते
जेव्हा,मतलब,स्वार्था,हेतू साध्या झल्याच कळते
तेव्हा पश्चात्तापशिवय काहीच नसते.
क्षणभंगुर सुखासाठी
वाट चुकली की प्रायश्चित्तही करता येत नाही
तेव्हा पावले जपुन टाकावीत
तुमच्या सोबतचा माणुस किंबहुना चालता बोलता भेटणारी माणसं
किती चांगली?
हे ओळखता आले म्हणजे मनस्ताप होत नाही
ओळख खुप लोकांशी असते
पण मन मोकळे आपल्याच हक्काच्या माणसाजवळ करता येते
तुम्ही जास्त काळ
दुसऱ्याला रडवू अथवा दुःख देवू शकत नाही.
जिंकण्याची संधी प्रत्येकाला मिळते
नेहमी जिंकणाऱ्यचा एकदिवस पराभव निश्चीत असतो.
एखाद्याशी खोट बोलून फसवणूक करणे
म्हणजे स्वताला उध्वस्त करून घेणे.
दुःखात,संकटात आजारपणात,
फक्त आपलीच माणस जवळ असतात
तेव्हा भूरळ घालणारी नातेसबंधी पारखून घेतली पाहीजे.