२६ /११ दहशतवादी हल्ला
२६ /११ दहशतवादी हल्ला
२६/११ ही तारीख पाहताच आठवतो मुंबईवरील तो दहशतवादी हल्ला,
ज्यामध्ये अनेक निरपराधी लोकांनी आपला जीव गमावला ||१||
घरातून बाहेर पडताना त्यांना वाटले पण नसेल की आपल्यावर आज अशीही येईल वेळ,
काही कळायच्या आतच नियतीने खेळला या भोळ्याभाबड्या जनतेशी असा हा मोठा खेळ ||२||
कोणाचे बहीण-भाऊ तर कोणाचे आई-वडील या हल्ल्यात मारले गेले,
क्षणार्धात या मुंबापुरीचे होत्याचे नव्हते झाले ||३||
प्राण पणाला लावून अशोक कामटे, हेमंत करकरेंसारखे देशप्रेमी शत्रूंशी लढले,
पण मुंबईला शत्रूंपासून वाचवता वाचवता त्यांनी स्वतःचे प्राण गमावले ||४||
हा प्रसंग आठवला की लगेचच येतो अंगावर काटा,
या दुःखद आठवणींचा प्रत्येकाच्याच मनाच्या कोपऱ्यात आहे एक छोटासा साठा ||५||
या हल्ल्यानंतर हळूहळू मुंबईने स्वतःला सावरले,
काही काळ जाताच सर्वांनी या नगरीला पूर्वपदावर आणले ||६||
मुंबईला पूर्वपदावर आणण्यात मुंबईकरांचाच आहे सिंहाचा वाटा,
चला तर मग काढून टाकू या दहशतवादाचा मुळापासून काटा ||७||