प्रेमाचा पावसाळा
प्रेमाचा पावसाळा
दोष कोणाचा?
"शरीराची भूक "
वडिलांचा कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय होता त्यामुळे सकाळी लवकर व्यवसाया निमित्त बाहेर पडत दिवसभर व्यवसायाचा व्याप आणि सायंकाळी रात्री अपरात्री घरी परत येत होते . मोठी मुलगी लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी तिच्या अपेक्षा पाहिजे ते तिला मिळे कोणत्याही प्रकारची इच्छा व्यक्त केली की तिचे वडील दुसऱ्या दिवशी ती गोष्ट सादर करीत त्यामुळे लाडात वाढलेली मुलगी वय पंधरा वर्ष पूर्ण दहावीची परीक्षा देऊन ११ वी प्रवेशाची तयारी चालू होती वडील व्यापामुळे बाहेर राहत होते आणि आई मुलीला कोणत्याही प्रकारचे किंवा रागावणे नाही .मुलगा लहान असल्यामुळे त्याचे खूप कौतुक होत.घरांमध्ये श्रीमंती आणि कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे विविध प्रकारचे व्यवसायिकांची संबंध होते समाजातील मोठ्या व्यक्तींशी ओळख होती अकरावीला कॉलेजला ॲडमिशन साठी शहरामध्य जाणे आवश्यक होते . वेळे अभावी वडिलांनी गाडी ड्रायव्हर आणि सोबत त्यांचा असणारा भाचा जो कामामध्ये मदत करीत होता . व त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरी करीत असल्यामुळे त्यांचापूर्ण विश्वास होता .त्यामुळे कॉलेजला ॲडमिशन साठी लाडाकोडात वाढलेली संगीता मोटर गाडी मिळाल्यामुळे शहरा मध्ये ऍडमिशन च्या नावाखाली जात होती .प्रवासात जाता येता जवळीक वाढली प्रशांत वर विश्वास असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा पण परतू येत नव्हता त्याचे वय साधारणता वीस पंचवीस वर्षाच लग्न झालेलं होतं घरी बायको होती.मात्र नोकरी मुळे मला सांगेल तिथे जाणं व त्या पद्धतीने कामे करणे . संगीता रोज नटून थटून कॉलेजला जात होती .स्वतंत्र गाडी सोडवायला घ्यायला त्यानंतर कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींची ओळख वाढली आणि या वयामध्ये मुला मुलींमध्ये नैसर्गिक रित्या असलेले आकर्षण ? तारुण्यात असलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा मनात आणि शरीरात साधर्म्य जागृत होतो का ? पहिल्या दिवशी संगीताची वर्गामध्ये एका सुंदर अशा मुलाशी ओळख झाली . हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले . कामासंबंधी एकमेकाच्या घरी कॉल करणे . भेटी त वाढ झाली सुट्टी मध्ये विविध पद्धतीने संगीता भेट घेत . सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय मनाला शांती नव्हती त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मैत्रिणीला भेटण्याचा निमित्त करून शहरात जात होती . एक दिवशी मात्र भेटण्यासाठी संजय एखाद्या गार्डनमध्ये किंवा हॉटेलमध्ये बोलवत असे मैत्री घट्ट झाली अशाच एके दिवशीभरपूर वेळ झाल्यामुळे रात्री मैत्रीनीचा वाढदिवस म्हणून संगीताने घरि सांगितले संगीताने बाबांना फोन केला की बर्थडे असल्यामुळे मी आज मुक्कामी तिच्या कडेच थांबणार ? शेवटी वडिलांचा विश्वास ? असल्यामुळे त्यांनी होकार दिला .तिकडे संजय ला कुठे थांबावे चिंता पडली .शेवटी त्यांनी हॉटेल मध्ये रूम बुक केली तिथे जेवण झाल्यानंतर फिरत फिरत हॉटेलवर पोचले . एकमेकांवर असलेल प्रेम आणि त्याला शारीरिक ओढ . प्रेमाची व्याख्या समाजातील प्रभाव मुळे ते एकमेकांच्या मिठीमध्ये कधी विलीन झाले ते तारुण्याच्या उंबरठ्यावर आणि शरिराची भूक जागृत झाली . शेवटी तारुण्याचा उपभोग घेणे एक दैनिक गरज वाटते .लग्ना आधी शरिर संबंध . चारित्र्य ? स्पर्श या साऱ्या गोष्टी तीला एक विरंगुळा व आनंद मिळवण्याच्या गोष्टी वाटत असल्यामूळे शरिर सुख उपभोगणे त्यांना एक गरज वाटली व त्या रात्री प्रेमाच्या नावाखाली शरिसुख परमोच्च आनंद वाटू लागला मानवी जीवनातील सर्वोच्च क्षण , स्वर्ग सुख सारे काही त्याच चांदणी रात्र रंगवली सर्व काही उपभोग घेतला .दुसऱ्या दिवशी सकाळीच घरि जाण्यासाठी निघाले ? मैत्रीचं प्रेम व शारिरीक उपभोग घेण्याची चटक वाढत गेली आणि वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्या हळूहळू भेटी वाढत गेल्या निसर्गनियमाप्रमाणे सुरक्षित साधने न वापरता केवळ तारुण्याची मज्या . आनंद लुटण्याच्या सवयीचा परिणाम ? आणि व्हायचा तोच झाला.नैसर्गिक रीत्या असणारे शरीराचे गुणधर्म साधारणता एक , दोन आठवड्यानंतर दिसत होते. तेव्हा आईला शंका आली? मात्र वडिलांना सांगणार कसे? व तिला डायरेक विचारलं तर ?तीही कोणत्याही प्रकारचा त्रागा करणार . म्हणून तिने स्वतः आजारी असल्याचे सांगून डॉक्टरांकडे तपासणी साठी जायचं आहे म्हणून सांगितलं तीला बरोबर घेतल् आणि गेली जाण्यापूर्वी संगीताच्या आईने हॉस्पिटल मध्ये असलेल्या गोष्टी चीं डॉक्टरांना कल्पना दिली की मुलीची तपासणी करायची आहे . मात्र ती मुलगी आणि तिने स्वतः भोगलेले शारीरिक सुखआणि त्याचे परिणाम ती बघत होती .आणि त्याचे दुष्परिणाम हेही माहिती होते त्यामुळे ती दूर राहण्याचा प्रयत्न करू लागली .मात्र डॉक्टरांनी विशिष्ट पद्धतीने एकांतात घेऊन सांगितल्यानंतर तिची तपासणी करण्यात आली . ती प्रेग्नंट असल्याचे तिच्या आईला सांगितलं .आता मात्र पायाखालची जमीन सरकली घरीफोन करून घडलेली हकीकत सांगितली गावामध्ये एक प्रतिष्ठित आहोत आपल नाव खराब होईल त्यामुळे त्यांनी काय करावं हेच सुचत नव्हतं रात्रभर दोघांनी खूप विचार केलाय एका बाजूला एकुलती एक लाडाची वाटलेली मुलगी ? दुसऱ्या बाजूला समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा ! व्यवस्था आहे
या शारीरीक भूक भागवण्या पोटी सारे वैभव , प्रतिष्ठा, समाजात आमच्या कडे बघण्याची दृष्टी सारे काही धुळीला मिळेल . लग्ना आधी प्रेग्नंट ? न पचणारी व समाज व्यवस्थेत न बसणारी गोष्ट समाज स्वीकारणार नाही त्यासाठी त्यांनी निर्णय घेतला अब्रॉशन करणे जी गोष्ट लग्नांनतर अगदी वाजत गाजत केली जाते सीच्या अस्थित्वाची गोष्ट विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतो मात्र या भूकेपोटी सर्वांची तहानभूक हरपून गेले होते तेंव्हा आई वडीलांना जाणीव झाली खरंच आपण संस्कार व संस्कृती नीती मूल्यांची जाण पाल्यांना करून देण्यात कमी पडलो आईने ज्या गोष्टी मुलींना सांगणे आवश्यक होते त्या गोष्टी न देता प्रतिष्टे पाई नितिमूल्यां च्ची कशी वाट लागते ते कळाले घरातील साधे नोकर , भांडेवाली हि तुच्छतेने बघु लागली . का? लग्ना नंतर जी शारिरीक भूक अगदी स्वागरात्र म्हणून बिछाना सजवुन भागवली जाते तीच भूक फक्त समाज मान्य ता नसल्याने एक निष्पाप जीव धोक्यात घालून ते लपवण्याची व सर्व कुटुबांतील लोकांना कलंक लागला ? ज्या स्त्रीला लक्ष्मी च्या पावलांनी घरात आणले जाते तीच आज मागच्या दाराने आत येत होती . जी गोष्ट मिरवायची ती लपवण्याची वेळ आली . कायद्याच्या बंधनामुळे अॅब्राशन चोरून करण्यासाठी प्रयत्न सुरू केले . बापाला कन्यादान करतांना होणारा आनंद कन्याडाग झाला . अन्नाची भूक लागते तेव्हां अन्न मिळवतांना मागितले तर भिकारी ही उपाधी मिळते . मात्र हि तारुण्याची भूक लागली होती अणि उपाधि कोणती ? कुल्टा , वाईट चालीची , माती खाली , शेण खाले , एक ना अनेक उपाधी मिळाल्या तेव्हा कळाले शिक्षण , व संस्कार योग्य वेळी योग्य रितीने न मिळाले त्यामूळे कशी पारिस्थिती निर्माण होते . त्यासाठी घेतलेला निर्णय योग्य अयोग्य ते नियतीच ठरवते . शेवटी काही दिवसात चर्चा गावभर पसरली सतत अपमान व हानी त्यामूळे एक दिवस संगिताने विष घेतले ती भूकबळी ठरली . वर्तमान पत्रात एक मोठी बातमी होती कचरापेटीत फेकलेले अन्न खाल्याने झोपडपट्टीतील बालकाचा भूकबळीने मृत्यु व त्याच शेजारी संगिताची बातमी विषबाधेमुळे मृत्यु ?
मरतांनाही कारण लपवण्याची वेळ यावी ! संगिताही होती एक "भूकबळीच " प्रेमाच्या पावसाचा बळी . तारुण्याचा बहर जणु वसंताच्य
त्रुतु चे आगमण जेंव्हा पातळी ओलांडते तेव्हा होतात अनेक बळ पावसाचे ' पुराचे भूकेचे बळी तेच हे एक प्रेम बळी.