"स्वच्छ भारत"
"स्वच्छ भारत"
चला करु या आपण परिसराची स्वछता,
घेऊ या न कचरा करण्याची दक्षता.
ठेऊ या परिसर नेहमी योग्य,
तरच मिळेल निरोगी आरोग्य.
खरच होईल का परिसर स्वछ?
ज्यांच्या मनात आहे विचार तुच्छ !
आधी करु या स्वच्छता मनाची,
तरच होईल निर्मिती स्वच्छ व सुंदर समाजाची .
करु या केरकचरा व प्लास्टिकची विल्हेवाट,
तरच मिळेल स्वच्छतेला मोकळीक वाट.
सुरु झालय स्वच्छतेच आशादायी अभियान,
होतंय हळूहळू कमी कचऱ्याच प्रमाण.
चला घेऊ या झाडू प्रत्येकाच्या हाती ,
करु या आपल्या परिसराची प्रगती.
तरच होईल सशक्त भारताची निर्मिती,
कारण स्वच्छता हीच खरी संपत्ती!!!