समजून घेतांना
समजून घेतांना
समजून घेतांना साऱ्यांना
होते मनाची कुचंबणा
कधी तडजोड, कधी माघार
घेऊन दूर सारावा "मी"पणा
स्वाभिमानाचा नसे विचार
त्याग, समर्पणाची आहुती
मुरड मनाला, लगाम भावनेला
स्वत्व विसरून जपावी
लागतात नाती
परिस्थिती समजून घेतली तर कळते मनस्थिती
समजून घेतांना सगळ्यांना
त्रास होतो मनाला दूर सारुनी
चिंता- विवंचना आवर घालावा लागतो स्वतःला
कोणाला समजून सांगणे ही
खूपच कठीण असते गोष्ट
मनासारखे वागत असतात
लोक इतरांना किती होवो कष्ट..