सामजिक प्रश्न
सामजिक प्रश्न
नभ दाटून येतात आनंद गगनी मावेनासा होतो,
नदी, सागर भरून वाहतो करतो पावसाचे स्वागत
कधी हा सुखावणारा तर कधी हा धास्ती भरवणारा,
रूप याचे अतिवृष्टी रूप याचे मेघ गर्जना
शेतकरी भरपूर पावसाने सुखावतो,
पण पुढे येणाऱ्या काळासाठी तो तयार नसतो
पाऊस आपले भयंकर रूप दाखवतो,
सर्वसामान्य माणूस या काळासाठी तयार नसतो
हे रूप म्हणजे 'पूर परिस्थिती' असते,
जन माणसांचे जीवन विस्कळीत होते
राबून केली ती शेती वाहून जाते,
घाम गाळून केलेली मेहेनत वाया जाते
कपाळी हात मारून तो शेतकरी उदास होतो,
घर कसे चालवावे? कर्ज कसे फेडावे या काळजीने आत्महत्या करतो
जगी कमी नसे सामजिक प्रश्न,
गरीबी हा एक मोठा गहन प्रश्न
महामारीची लाट निर्माण सध्या झाली,
'अर्थव्यवस्था'सुद्धा त्याच्या परिणामाने ढासळली
'निरक्षर' जीवन पैशाअभावी माणूस जगतो,
त्याची भरपाई म्हणून, लोकसंख्या वाढ, बालमजूर, बालविवाह अशी दयनीय कामे माणूस करतो
समजाच्या तीन रेषा-गरीब, मध्यम, उच्च आहेत,
'भ्रष्टाचार', 'जातीभेद' हे त्याचेच परिणाम आहेत
अजूनही स्त्रिया मुली यांचा विरोध, छळ होत आहे,
असे नको वागू 'निर्मळ मना' त्या स्त्रिया मुलींचे सुद्धा एक
हृदय आहे
जीवनी 'सामाजिक समस्या' अतीव दुःख देणाऱ्या उत्पन्न झाल्या आहेत,
पण त्यातून मुक्तता करणे आपल्याला शक्य आहे
एकमेकांचे साहाय्यक होवूनी हे कार्य पूर्ण करू शकतो,
सगळ्या प्रश्नांची सोडवणूक सहज करू शकतो
प्रश्न सुटले की शांत जीवन होईल,
सूर्याची सोनेरी किरणे, चंद्राची शीतल सावली रोज देही हर्ष उल्हासित करेल
जीवन जगण्याचा एक अर्थ असेल,
'आनंद' या शब्दाची खरी किंमत सुद्धा नक्की असेल