नियती
नियती
नियतीच्या मनात वेळोवेळी नवीन असते काही
कधी दुःखाची झळ तर कधी सुखाची चाहूल आयुष्यात आपल्या येत जात राही
जीवनात चढ-उतार असतात विधिलिखित
बोध घेण्यासाठी केले असावे का निर्मित..?
चांगले कधी वाईट हे समीकरण असत सुरू करून कुठे थांबायच हे शिकायलाही मिळत
कधी हसता हसता आसमंत गहिवरून येतो हिरवीगार पालवी, तरी त्याचा पालापाचोळा होतो
पाहता पाहता डोळ्यात अंधारून येते फुलले सारे माळरान
ओसंडून जाते
नियती अशी काही खेळ मांडते
भरली ओंजळ, क्षणात सारे सांडते
बहरता बहरता ऋतू संपून जातो
देह जाळीत हा वनवा वैशाख होतो आयुष्याच्या शेवटी जीवनाचे रहस्य उलगडते
पानगळी नंतर नवी पालवी, सृष्टीला देखील बहर येते..