निद्रानाश व श्यामच्या आईची गाथा
निद्रानाश व श्यामच्या आईची गाथा
अशी कशी अवेळी मला सोडून तु गेलीस?
भर माध्यान्ही एकटीस या भर काळोख्या रातीस||१
तुझ्याशिवाय मला प्रत्येक क्षण युगासम वाटे|
अनामिक हुरहुर चिंता व भिती ऊरात दाटे||२
नको त्या गत आठवणींचे मम ह्रदयी बोचती काटे|
विचारां मागे स्मृतींनाही नव नवीन बघ पालवी फुटे||३
माझ्या विकारावर तुचअसे गं एक खरा उपाय|
विना तुझ्या जीवन जगणे होते अशक्य प्राय ||४
लेकरास हवी माय जशी लागे वासरास गाय|
शिवाय त्यांच्या जीवन दोघांचे शुन्यवत होय||५
मला हवी हो आजही अंगाई गात जोजवणारी आई|
स्वत: राहून जागी जी मज ममतेने थोपटीत राही||६
साथ देई मज विसरण्यास तिला निद्रादेवी माई|
तु सा-या दु:ख वेदनांवर रामबाण इलाज गं होई||७
बोलावू तुज आता मी गडे गं कोणत्या उपायी?
तुजविण मजला येथ कोणी वाली उरला नाही||८
प्रतिक्षेत तुझ्या मी रात्रंदिन जाग जाग जागते|
स्वप्नांत ही तुच येण्यास मज तुझीच गरजभासते||९
जागे राहुनी कोण मज स्नेहे थोपटीन आई?
लावूनी काजळ तीट माझी दृष्ट काढेन बाई||१०
स्वामी तिन्ही जगाचा होय आई विणा भिकारी|
स्मृती दाटता तिची का मज होय शोककारी?||११
शिवबा तुझ्याच संस्काराने झाला गं छत्रपती|
शाम सानेगुरुजी झाले नावे सांगु तरी किती?||