STORYMIRROR

Prashant Kadam

Tragedy

3  

Prashant Kadam

Tragedy

दुष्काळ एक मोठी समस्या !!

दुष्काळ एक मोठी समस्या !!

1 min
134

दुष्काळ म्हणजे खरे तर

नाही निसर्गाचा प्रकोप

हा तर आहे मानवी

अमानवीय वृत्तीचा प्रताप


आवश्यक तेवढी होत नाही

ब-याच वर्षी पर्जन्यवृष्टी

पण मानवाची ही आहे चुकी

त्याने कुठे ठेवली दूरदृष्टी


पर्जन्यवृष्टी जेंव्हा झाली 

तेंव्हा साठवलं नाही पाणी

आता पिण्याच्या पाण्यासाठी

डोळ्यात येतंय पाणी


घातले नाहीत बांध बंधारे 

जिरवलं ही नाही पाणी

वृक्ष तोड थांबविली नाही

नाही केली नवी रोपणी 


कौंक्रिटी करण,जंगल तोडीने

निसर्गाचे होतेय नुकसान

पर्जन्यवृष्टीच थांबल्या मुळे

शेतक-यांचे गळतेय अवसान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy