दुराव्याचे शौर्यगीत.....
दुराव्याचे शौर्यगीत.....
तुला विसरण्याचे बहाणे कित्येक झाले आता
पण तुझ्या आठवणीचेही क्षण राहिले नाही
सोडविताना हात तो गहिवरले होते विचारही
जगण्यास आता मनाचा ओलावा उरला नाही
धागा माझ्या प्रेमाचा गुंतलाच नाही आपल्यात
पण साधा शब्दगंधही तुला कधी मोहलाच नाही
प्रश्न कितीतरी अजूनही आहे अनुत्तरितच माझे
उत्तराची वाट तुला कधी त्यांची मिळालीच नाही
मिठी शेवटची जरा ती का जाणे बोचरी वाटली
पण अजूनही तिची ती सल कमी झालीच नाही
वर्षागणिक दिवस मोजत गेले सरणावरती तरी
पण श्वास शेवटचा अजूनही सुरळीत झाला नाही
किती सहज होते शोधणे प्रेमाच्या सुखालाही पण
इश्काच्या पावसात साधे तुला भिजता आले नाही
दुराव्यासाठी लाख आरोप असतील तुझे माझ्यावर
पण पुरावा माझ्या सोबतीचा तुझ्याकडे एकही नाही