STORYMIRROR

Vishalraje Bore

Action

3  

Vishalraje Bore

Action

बळीराजाची कहाणी

बळीराजाची कहाणी

1 min
28.6K


डोळ्यात पाण्याचा थेंब नाही मनातलेही ढग आटुन गेले,


आपलं कुणीच नाही म्हटल्यावर फक्त हुंदकेच दाटुन आले.


वचनांची फक्त खैरात होती, पण एकही त्यांनी पाळलं नाही, 


बळीराजा एवढं तुम्ही, कुणालाच कधी छळलं नाही. 


बळीराजाला सोडुन सर्वाना पॅकेज येथे जाहीर झाले 


बळीराजा म्हणे जगाचा पोशींदा पण त्यालाच सारे विसरुन गेले. 


माळरानावर पलीकडे आता दिसत नाही हिरवं रान, 


गाई वासर कानात सांगतात मालक सोडु नका ना प्राण ! 


दोष सरकारला देतच नाही आम्हीच खंबीर वागल पाहीजे, 


आपणच कमावन आपणच खाणं हेच धोरण आखलं पाहिजे, 


मुक्या जिवालाही समजते बळीराजाची सारीच कहानी, 


बळीराजा सोडुन सारेच मस्त, किती माणसं झालीत ना ! शहाणी. 


गळफास, मरण सोडलं आम्ही, चला ठणकावुन सांगुया जगाला , 


बळीराजा आहे जगाचा पोशिंदा जो चालवतो या देशाला !! 


मदतीची गरजच नाही, अपेक्षाही नाही आम्हाला, 


पण भाव तरी द्या राजेहो ll आमच्या रक्त आटलेल्या घामाला !!! 


आमच्या रक्त आटलेल्या घामाला !!! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action