STORYMIRROR

Manoj Joshi

Romance

3  

Manoj Joshi

Romance

भाग्य

भाग्य

1 min
307

हातांच्या रेषांवर कुठे लिहिले होते

भेटणे आपूले कुणी सांगितले होते


होतो रहात दोघे एका गावी तरीही

दुरावे आपल्यातले कुणी सांधले होते


नजरेस नजर भिडावी घडले नाही कधी

गाणे अंतरी भीडणारे कोणी गायले होते


हातात हात यावा, योग कधी न आला

हृदयाचे हृदयी मिळावे, कसे घडले होते


खूलून कधी न आला गुलाब तूझ्या गाली

काटे परी दोघांतले ते कुणी वेचले होते


पाहता तूला हिरवा रानवारा न बहकला

कस्तूरी अंतरास कुणी गंधीत केले होते


घडले वेगळे न काही अचानक वाटणारे

तरीही भेटताना शब्द ओठी थांबले होते


गाठी जन्मांतरीच्या ह्या ठरलेल्या होत्या

पाहता तूला क्षणीच मला कळले होते


गमले मला रहस्य ह्या हातांवरील रेषांचे

चेतनच्या शब्दांमध्येच ते लपले होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance