अनुभव
अनुभव
अनुभव माझा खरा खरा सांगतो तुम्हाला,
सदा न कदा दुःखच आले माझ्या वाट्याला
सकाळ संध्याकाळ मागणे मागितले देवाला,
याच्यातून सुखरूप बाहेर काढ रे मला
आलेल्या संकटांनी होरपळून मी निघालो,
तरीही त्यातून माझा मीच असा सावरलो
चप्पल जरी झिजली तरी माघार नाही घेतली,
तुमच्या सारख्यांची उमेद नवी अशी मी चोरली
दुःखाला कवटाळून मी कधीच नाही बसलो,
उमेदीने नव्या सुखाचा मार्ग शोधतच फिरलो
अखेर हार मानली त्या साऱ्याच दुःखांनी,
आणि पायात लोळण घेतली याच सुखांनी
अनुभव माझा खरा खरा सांगतो तुम्हाला,
जगातील सारीच सुखं आता माझ्याच वाट्याला