आयुष्याच्या अखेरीस
आयुष्याच्या अखेरीस
आयुष्यभर कष्ट केलीत
पण मनासारखे जगता आले नाही
राब राब राबत गेलो
पण माणस् कळली नाहीत
ईच्छा साऱ्या दुर ठेवून
आयुष्यभर गरज सर्वांची पुर्ण करत राहीलो
स्वतःसाठी कमी मात्र
दुसऱ्यांसाठी जास्त
जगलो
नोकरी असेपर्यंत
सारकाही सुखासीन असतं
त्यानंतर मग सारकाही
उदासीन दिसतं
निवृत्ती म्हणजे आरामाचे
दिवस असतात
त्या आरामालाही सारेच कसे
कंटाळलेले दिसतातं
आयुष्यभर किती मरमर केली
याचा कोणी विचार करतं नाही
पैशाशिवाय कोणी जवळचा वाटतं नाही
काय कुठे जमापुंजी असेल ती सांगून द्या
असा रोज उपदेश देतात
कागदपेन हाती घेवून
नावे करण्याचा आग्रह धरून बसतात
आयुष्याच्या अखेरीस
आपलेपणा पेक्षा
दुरावा जास्त असतो
काळजी घेण्याऐवजी
मनात स्वार्थ जास्त दिसतो
शेवटी काय.....
प्रॉपर्टीवर डोळा ठेवून
खोट प्रेम करतात
प्रॉपर्टीसाठीच तर सारे
नात्यागोत्यांच विभाजन करतात
जे कमावतो ते सार
वारसदारांच्या हक्कातच असते
स्वतःसाठी मात्र पेन्शनशिवाय
काहीच नसते
माणूस मेल्यानंतर स्मशानात
पोहचवण्यापुरताच
त्याला आधार असतो
त्यानंतर तो कोणाच्याही
आठवणी नसतो
