आजच्या काळापुढील प्रश्न
आजच्या काळापुढील प्रश्न
माणसाचे संघर्षमय जीवन असल्यावर
प्रश्नांची नुसती सरबत्ती असते
एक ना दोन हजार प्रश्न भेडसावतात
मग काळरात्र डोळ्यापुढे दिसत राहते १
माणसाने वृक्षतोड केल्यावर
पर्यावरण संतुलनच बिघडले
निसर्गाचे चक्रच उलटे फिरल्यावर
महापूर,ओला दुष्काळ कर्दनकाळ ठरले २
पुरूषप्रधान संस्कृती असल्यामुळे
बलात्कार,हुंडाबळी,भृणहत्या वाढले
अंधश्रद्धा,रूढी परंपरांनी तर
समाजावर अधिराज्य करून ठेवले ३
व्यसनाधीनतेने समाजाला पोखरले
जातीभेद,दंगल,दहशतवाद पाचवीला पूजले
दानधर्म,सेवाभाव तर दूरच राहिले
म्हणूनच मायबापांना वृद्धाश्रमात पाठवले ४
नवीन तंत्रज्ञानाने प्रगती झाली खरी
पण तरीही स्वार्थ,मतलब वाढलेला
शिक्षणासाठी अवाढव्य खर्च करून
माणूस पैशाच्या मागे धावत सुटलेला ५
माणूसच सारे प्रश्न निर्माण करतो
आणि स्वतःच त्यात अडकत जातो
सोशल मीडिया,मोबाईलच्या अतिवापरामुळे
मानव जातीचा र्हास होताना दिसतो ६
