किमयागार (कथा मालिका)भाग १९
किमयागार (कथा मालिका)भाग १९
आणि व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार पण होताच. पण ती काही मेंढ्या इतकी महत्त्वाची नव्हती कारण ती त्याच्यावर अवलंबून नव्हती. आणि ती त्याला विसरली असण्याची पण शक्यता होती. आणि तो कोणत्या दिवशी तिला भेटेल याने तिला काही फरक पडत नव्हता कारण तिच्यासाठी सर्व दिवस सारखेच होते. कारण अशा लोकांना त्यांच्या जीवनात प्रत्येक नवीन दिवशी काही तरी चांगले घडू शकते हेच कळत नाही.
मी माझ्या आई वडिलांना सोडून आलो, त्यांंना मी ' नसणे ' सवयीचे झाले आहे तसेच मेंढ्यांना मी नसण्याची सवय होईल. त्याच्या मनात आणि काही विचार येत होता इतक्यात त्याच्या चेहऱ्यावर वारा झोंबला. याच वाऱ्याबरोबर मुर लोक आले होते . आणि हे लोक हिंमत करून काही मिळवण्यासाठी इकडे आले होते.
वारा जसा स्वतंत्र असतो तसे आपणही स्वतंत्र असतो तर त्याच्या मनात आले. त्याला आता त्याच्याशिवाय कुणीच थांबवू शकत नव्हते,
ना मेंढ्या ना व्यापाऱ्याची मुलगी ना अंदालुसीआची मैदाने व कुरणे.
तो त्याच्या भाग्यातील संधी मिळवण्यापासून आता थोडीच पावलं दूर होता. तो त्याचे नशीब आजमावणार होता.