केले कबूल
केले कबूल
फुलगाव आणि आणि सुनगाव ही दोन जुळी
खेडी होती . जसे एका आईची दोन जुळी
मुले असतात ना ! अगदी तसेच . या दोन
गावांच्या मधे फक्त नदीचं आडवी . त्यामुळे
काय ती दोन गावं वेगळी दिसत . म्हणून
ती जुळी गावे . तर त्या सुनगावमधे एक सम्या
राहत होता. तसे त्याचे ओरिजिनल नाव
समीर होते. लोक त्याला मानाने सम्या म्हणत.
सम्यालाही हेच नाव आवडत असे . बाजूच्या
म्हणजे फुलगावात रुपाली राहत होती .
नावाप्रमाणे ती रूपाने देखणी होती . रूपालीला
सर्व रूपा म्हणत . रूपा आणि सम्या दोघेही
तरुण . येता , जाता त्या दोघांची कुठे ना कुठे
नजरा नजर व्हायची . कधी वावराच्या मेरीवर,
तर कधी नदीकाठच्या मंदिरात तर कधी
आठवडी बाजारात . नजरेच्या खेळातून ,
प्रेमाचे बाण अचूक सोडले गेले होते . पण
प्रेमाची गाडी पुढे काही सरकत नव्हती .
सम्या खूप प्रयत्न करायचा , पण रुपाशी कधी
एकट्यात त्याचे बोलणे होत नसे.
कधी कधी ती दोघे एकाच S T मधून
तालुक्याच्या गावी जात असत. पण रूपा सोबत
नेहमी कुणी तरी असायचे . त्यामुळे बोलायची
पंचाईत. तो तिच्याशी बोलण्याचा चान्स शोधत
असायचा . एक दिवस , मिळाला चान्स .
त्याचे असे झाले की _ _ _
सम्या इलेक्ट्रिकचे बिल भरायला तालुक्याला
गेला होता. बिल भरून झाल्यावर तो , घरी
परत जाण्यासाठी S T स्टँड वर आला . तर
समोर रूपा उभी दिसली . त्याने आजूबाजूला
कानोसा घेतला . ती एकटीच होती . अहाहा _ _
मस्तच चान्स मिळाला . साम्यला भर दुपारी
आकाशात चांदण्या दिसू लागल्या . त्याने
दुरूनच मोबाईल मधे तिचा फोटो काढून
घेतला. नंतर तिच्या जवळ गेला. त्याला
दरदरून घाम फुटला . काय बोलावे हे सुचेना.
शेवटी हिम्मत करून म्हणाला,
"हाय रूपा . ऊन भयंकर आहे . चल आपण
उसाचा रस प्यायला जाऊ. "
काहीही न बोलता रूपा गोड हसली . सम्या
सोबत रस प्यायला तयार झाली. ती दोघे दोन
पाऊले जात नाही, तोच तिचा भाऊ आला .
त्याला पाहताच सम्याचे मस्तक ठणकले .
आत्ताच याला कलमडायचे होते का ?
सम्या मनात म्हणाला .
सम्याला तिचा भाऊ म्हणतो कसा,
"लय ऊन हाय गड्या . बाजारातून हे सामान
आणुन जाम थकलो मी. तू माझा शिवभाऊ
तुझ्यावर भरवसा हाय. मी असं करतो हे
समान इथच ठेवतो . तू या सामानवर लक्ष ठेव.
रूपा आणि मी रस पिऊन येतो ."
दात ओठ खात सम्या बसला सामानाची
रखवाली करत. तोंडाशी आलेला घास पळविने
काय असते , हे सम्याला आज कळले .
दिवसा मागून दिवस गेले, पण सम्याला रूपाशी
बोलणे काही जमले नाही. रोज रात्री मोबाईल
मधील रूपाचा फोटो बघून , तो त्या फोटोशी
बोलत होता. सुगीचे दिवस संपले अन् सुरू
झाली लगन घाई . सम्याचा मोठा भाऊ गण्या
लग्नाचा होता. पाच सहा पोरी पाहण झाल्यावर
गण्याच लग्न नेमक रुपाशी पक्क झालं.
आता झाली की , नाही पंचाईत _ _ _ !
नेमका त्याच वेळी सम्या त्याच्या आत्याकडे
गेला होता. अत्याच्या मळ्यातील टरबूज
काढण्याचे काम होते . तिकडून आल्यावर
त्याला हे मिस मॅच लग्नाचे कळले . पण
घरात उघड उघड तो काही बोलू शकत नव्हता.
पण मनातल्या मनात मात्र रडत होता. मग काय
त्याने खाणे पिणे सोडले . रोजच्या रोज त्याचे
किलो किलोने वजन कमी होऊ लागले .
त्याची तब्बेत अशी पाहून , त्याची माय म्हणाली,
"आत्याच्या घरी सम्याले भुतान झपाटल , म्हणून
तर हे पोरगं अस करून राहील ."
घरातील लोकांसमोर सम्या काही बोलत नव्हता.
पण रूपा साठी मात्र मनातून झुरत होता.
आता गाण्याच्या अन् रूपाच्या कुंकवाचा दिवस जवळ आला . नवीन सुनेसाठी म्हणजेच रूपा
साठी काठाची साडी अन् अंगठी आणली.
आता मात्र , सम्याने काहीतरी करायचे
ठरविले . या चान्स गेला तर भाऊ दुसरा
मिळणार नाही. असा विचार करून सम्याने
मग शक्कल लढविली_ _ _
त्याने काय केले असेल बरे ??
त्याने कुंकावासाठी आणलेली, रुपाची साडी
आणि अंगठी लपवून ठेवली . साडी अन्
अंगठी कुठेच दिसत नाही, म्हणून सम्याच्या
मायने सारे घर डोक्यावर घेतले . सर्वजण
अंगठी शोधण्याच्या कामात लागले . दुपारचे
दोन वाजले तरी , घरात चूल पेटली नाही .
सर्वच ठिकाणी अंगठी शोधून झाले , पण
कुठेच सापडली नाही . सम्याची आत्या , एका
डब्यात अंगठी शोधायला गेली , तर तिला
गव्हाच्या चिकाच्या कुरडया दिसल्या . तो
डबा तिने सम्याच्या माय समोर आपटला .
"काहो , वहिनी तुम्हाले काल , माया पोरासाठी
कुरया तळा म्हणल, तर कुरळ्या संपल्या
म्हणत होत्या . आता या डबाभर कुरळ्या कुठून
आल्या . "
"अहो , रख्माबाई माय ध्यानच नव्हतं , या डब्यात
कुरळ्या आहेत ते _ _ " माय
"ते काही नाही वहिनी , तुमाले , आम्ही माहेरी
आलेलो खपतच नाही. काही ना काही कुरापती
काढून आम्हाले हाकलून देत राहता . "
"असं , काही नाही रखमा बाई . तुमी मायावर
भलते आरोप , नका लावू . मी इतके मनापासून
तुमचे सण वार करते अन् तुमी , असे आरोप
लावता . " माय
दोघी नणंद , भावजयचे एकमेकिंवर आरोप ,
प्रत्यारोप सुरू होते . सम्या गालात हसून त्यांचे
प्रेमाचे भांडण ऐकत होता . ते भांडण त्याच्या
पथ्यावर पडले होते. त्या निमित्ताने सर्व ,
हरवलेली अंगठी विसरले होते .
"बरच झालं, अंगठी बद्दल सर्व विसरले .
अंगठी नाही मिळाली तर , कुंकवाचा कार्यक्रम होणार न्हाई. पुढचं पुढे पाहून घेऊ . आता पुरते
लग्न तर टळेल . "
लगेच दुसरी सोन्याची अंगठी आणू शकतील
इतके काही सम्याचे कुटुंब श्रीमंत नव्हते .
असा मनाशी विचार करीत , सम्या भांडणात
तेल ओतत होता . कधी आईची बाजू घेत होता
तर कधी आत्याची बाजू घेत होता . शेवटी
संध्याकाळ पर्यंत भांडण मिटले . सर्वांना भूका
लागल्या होत्या. लगेच खिचडी बनवून सर्व
जेवायला बसले. सम्या मनातून खुश होता .
जेवण होत नाही तोच , सम्याचा इब्लिश भाचा
सोहम अंगठी आणि साडी हातात घेऊन
नाचत नाचत आला .
"सापडली सापडली , नव्या मामीची अंगठी आणि
साडी सापडली ." असे तो जोराने ओरडत होता.
सर्वजण सोहम भोवती गोळा झाली . अंगठी
शोधली म्हणून सोहमचे कौतुक होऊ लागले .
सम्या मात्र , सोहम वर दात ओठ खात उभा होता.
शेवटी कुणीतरी सोहमला विचारले ,
"ही साडी आणि अंगठी तुला सापडली तरी कुठे ?"
"तिथेच होती , आबाच्या कपड्या काही , देवाच्या
बाजूला ." सोहम
"पण तिकडे , हे अंगठी अन् साडी गेली तरी कशी ?
मी तर ते आलमारीत ठेवली होती. "माय
सम्या कडे बोट दाखवीत, सोहम म्हणाला,
" या . सम्या मामाने तिथं लपवून ठेवले होते ."
"मग , तू आधीच का नाही सांगितले ." गण्या
"मामाने लपवून ठेवले होते , हे मी बघितलं होतं,
पण मग विसरून गेलो . आता आठवल , अन्
पटकन आणल ." सोहम
. आता सर्वांसमोर सम्याचा चेहरा उतरला .
शेवटी सम्याला कबूल करावेच लागले की ,
त्याचा रुपावर जीव जडलाय . त्यासाठी त्याने
हे सर्व केले आहे. हे ऐकून सर्वजण हसायला
लागले . माय म्हणाली,
"आत्याच्या घरून , रूपा नावाच्या भूताने झपाटले
होते म्हणायचे . मला वाटल दुसरे कोणते भूत
होते _ _ _ ?"
सम्या लाजला .
त्याच अंगठी आणि साडीवर सम्याचा आणि
रूपाचे कुंकू लागले .
आता सम्याच्या भावासाठी मुलगी शोधणे सुरू
आहे . मुलगी पसंत पडताच , दोन्ही भावांचे
एकाच मांडवात लग्न लागणार आहे _ _ _