STORYMIRROR

Girish S

Abstract Inspirational

3  

Girish S

Abstract Inspirational

भगवद्गीता अध्याय ५

भगवद्गीता अध्याय ५

2 mins
194

पाचवा अध्याय

कर्म संन्यास योग

अर्जुन म्हणाला, तू ज्ञान सांगून संन्यासाची महती सांगतोस , आणि युद्धास तयार होण्यास सांगतोस. कोणत्या मार्गानं माझे कल्याण होईल ते सांग. भगवान म्हणाले, संन्यास अथवा योगाने कल्याणच होते. निष्काम होऊन कर्म कर. सोपा कर्म मार्ग अनुसर. ज्याला इच्छा द्वेष नसतो तो संन्यासी असतो. अज्ञानी लोकांना सांख्य व योग भिन्न वाटतात, ज्ञानी लोकांना दोन्ही मार्ग एक वाटतात, व दोन्ही मार्गांमध्ये कल्याण होते. योग व सांख्य हे दोन्ही मार्गानी एकच गोष्ट प्राप्त होते. जो कर्म मार्ग अनुसरतो त्याचे कल्याण होते. कर्म मार्गाचे आचरण न करता संन्यास कठीण आहे. जो इंद्रियांवर विजय मिळवतो कर्म बंधन नसतात. तत्त्वज्ञ जरी पहात, खात, झोपत असले तरी काहीच करत नाही असे मानतात. स्पर्श, श्वास, दृष्टी या सर्व क्रिया चालू असूनही इंद्रियावर विजय मिळणारे योगी असतात. फळाची अपेक्षा सोडून जे कर्म करतो तो पापापासून निराळा होतो. ते बुद्धीचा उपयोग करून सावधपणे कर्म करतात परंतु निष्काम असतात, इंद्रियांवर विजय मिळवून आत्मशुद्धीसाठी कर्म करून शांती मिळवतात. कुणाचेही पाप-पुण्य परमात्मा ग्रहण करत नाही. अज्ञानाने वेढलेल्या जीवाला मोह होत असतो. सूर्य उगवल्यावर जसा प्रकाश येऊन अंधार संपतो तसेच ज्ञानाने अज्ञान संपते व आत्मज्ञान होते.

ज्ञानी मनाला हत्ती, गाय, श्व़ान, आपला व परका, हा श्रेष्ठ अथवा हीन असा भेद राहत नाही. अहंभाव संपतो. सर्वत्र सम राहून तो ब्रह्ममय होतो. प्रिय गोष्ट घडल्याने त्याला आनंद होत नाही किंवा अप्रिय गोष्टीमुळे तो दुःखी होत नाही. अंतरातील सुख ज्याला कळले त्याला इंद्रिय सुखे नकोशी वाटतात. इंद्रिय भोगाची इच्छा हेच दुःखाचे कारण असते. ज्ञानी लोक त्यात रमत नाहीत. ईच्छा, क्रोध यांचा जोर सहन करण्याची शक्ती असलेला माणूस सुखी व मुक्त होतो. त्याच्या मनातील संशय दूर झालेला असतो तो पापातून मुक्त झालेला असतो व सर्वांच्या कल्याणासाठी काम करुन मुक्ती मिळवतो. सर्व आसपासच्या वातावरणाला विसरुन दृष्टी दोन भुवयांमध्ये ठेवून तो श्वास रोखून धरतो व मन इंद्रिय बुद्धीवर नियंत्रण मिळवतो. तो इच्छा, भीती व रागापासून मुक्त होतो. संत, योगी, महात्मे मला सर्व यज्ञाचा हेतू मानतात. सर्व दुःखांचा नाश करून शांती मिळवून देणारा मानतात. व ते शांती प्राप्त करतात.            

कर्मसंन्यास योग नावाचा पाचवा अध्याय येथे संपतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract