तुला कळत कसं नाही
तुला कळत कसं नाही
तुला कळत कसं नाही
जगच सारं हे आहे कसं स्वार्थी,
तू कितीही मर त्यांच्यासाठी
कधीच नाही होणार ते निस्वार्थी
आहे गैरसमज हा तुझा
रक्ताचं नातं असतं नेहमीच खरं,
होण्या अगोदर पश्चात्ताप
सावध हे राहिलेलंच कधीही बरं
नसतं सोनं हे सारंच पिवळं
पारखायला तर शिकायलाच हवं,
टिकवून नात्यातील जिव्हाळा
समाधान हे त्यात शोधायलाच हवं