कर्म
कर्म
पेहराव आपला काही असो
सर्वश्रेष्ठ फक्त कर्म असो
भगवंत सगळ्यांचा एक आहे
हिशेबाचा ताळमेळ तोच पाहे
एवढी लालच बरी नसे
सर्वांचा मार्ग एक असे
टेकण लावून बोलणं वेगळं
नका फिरू लावून ठिगळं
प्रत्येक माणूस सक्षम असतो
पहिला संस्कृतीचा मान जपतो
त्यांच्या शिकवणीत दोष आहे
त्यालाच आमचा रोष आहे
उठलो आम्ही जर पेटून
अस्तित्व सुद्धा जाई मिटून
नाही चिट पाखरू उरणार
भगवंत आमचीच बाजू धरणार