चारोळी - प्रेम
चारोळी - प्रेम
प्रेम, राग, हास्य, दुःख,
सारं काही मांडलं,
चार ओळींच्या त्या कवितेतलं,
आयुष्य जगायचं राहिलं..
--
तुझ्या डोळ्यातलं काजळ..
माझ्या नावावरच थांबत..
तुझ्या पायाचं पैंजनदेखील..
माझ्या नावानेच वाजतं..
--
मला आठवतंय ते सारं साचलेलं..
भेटल्यावर बोलू म्हणून राहिलेलं..
भेटण्या अगोदरच्या क्षणांना वाचलेलं..
आणि भेटल्यावर स्वतःला मुकेपणात पाहिलेलं..