अचानक आले संकट...
अचानक आले संकट...
होती अमावस्येची रात्र
पसरला होता सर्वदूर अंधार...
त्याच अंधारानिशी
घडला मोठा अनर्थ...
लोक झोपेत होती
नव्हता कोणताच सुगावा
पण या तिवरे धरणाने
केला घात...
अन् संपूर्ण गाव केले
उद्ध्वस्त...
घर ही गेलीत
गुरे ही गेलीत
अन् संसाराचा डोलारा
वाहुनी गेला...
शोधाशोध चालू
होती...
पण कोणही भेटलं
नाही...
होते नव्हते
ते सर्व गेले...
वाटलं नव्हतं
असं कधी घडेल
पण घडलेच...
पण घडलेच...