आयुष्याच्या अखेरीस
आयुष्याच्या अखेरीस
आयुष्यभर कष्ट केलीत
पण मनासारखे जगता आले नाही
राब राब राबत गेलो
पण माणस् कळली नाहीत
वेदना यातना भोगूनही
दुःख दुर जात नव्हते
सुखही आडोसा घेवून
वाकुल्या दाखवतं होते
ईच्छा साऱ्या दुर ठेवून
आयुष्यभर गरज सर्वांची पुर्ण करत राहीलो
स्वतःसाठी कमी मात्र
दुसऱ्यांसाठी जास्त जगलो
क्षण आनंदाचा
कधी घेता आला नाही
आनंदाच्या क्षणात कधी मी दिसलो नाही
नोकरी असेपर्यंत
सारकाही सुखासीन असतं
त्यानंतर मग सारकाही
उदासीन दिसतं
निवृत्ती म्हणजे आरामाचे
दिवस असतात
त्या आरामालाही सारेच कसे
कंटाळलेले दिसतातं
आयुष्यभर मरमर केली
याचा कोणी विचार करत नाही
पैशाशिवाय कोणी जवळचा वाटत नाही
काय कुठे जमापुंजी असेल ती सांगून द्या
असा रोज उपदेश देतात
कागदपेन धरून नावे करण्याचा आग्रह धरून बसतात
आयुष्याच्या अखेरीस
आपलेपणा पेक्षा
दुरावा जास्त असतो
काळजी घेण्याऐवजी
मनात स्वार्थ जास्त दिसतो
शेवटी काय प्रॉपर्टीवर डोळा ठेवून
खोट प्रेम करता
प्रॉपर्टीसाठीच तर सारे
आपसात भांडून नात्यागोत्यांच विभाजन करतात
जे कमावतो ते सार
वारसदारांच्या हक्कात जाते
स्वतःसाठी मात्र पेन्शनशिवाय
काहीच नसते
मेल्यानंतर स्मशानात
पोहचवण्यापुरताच
आधार असतो
त्यानंतर कोणाच्याही
आठवणी नसतो
