मोगरा फुलला....
मोगरा फुलला....
प्रेम म्हणजे प्रेम असत... तुमच आमचसेम असत... जगातील सर्वात सुंदर भावनाम्हणजे प्रेम... काहिंना प्रेम पहील्या नजरेतहोत.... काहींना आयुष्यभर हुलकावणी देत...हेच ते प्रेम... प्रेम मिळो अथवा न मिळो...पण ते अनुभव खुप सुंदर असतात...अशीच एक स्टोरी... खुशबु आणि ईशान...यांची... खुशबु आणि ईशान एकाच ऑफीसमध्येकाम करायचे. दोघेही रोज कामानिमित्तचफक्त बोलायचे. हळूहळू ते एकमेकांशी बोलूलागले, त्यांच्यात मैत्रीच सुंदर नात निर्माण झाल होत. व्यक्त होऊ लागले. एकमेकांनसोबतराहू लागले. मैत्रीमुळे ते मनमोकळे पणानेबोलायचे. कामात एकमेकांना सपोर्ट करायचे.ऑफीसला येताना आणि जाताना असा सोबतरोजचा त्यांचा प्रवास. ईशानला खुशबुची मैत्रीआणि सोबत हवीहवीशी वाटु लागली. तसतिलाही ईशान आवडायचा. मैत्रीच्या नात्याचप्रेमात कधी रूपांतर झाल ते कळल देखीलनाही. पण ईशान काही बोलत नाही. त्यामुळेखुशबु काही बोलत नव्हती. पण हे जे काही दोघांच नात आहे तिला खुप छान वाटत होत. एक सुंदर नातं आणि प्रेमाचा प्रवास सुरू झाला होता. दोघांचाही दिवस सूरू व्हायचा तो सोबत आणि संपायचाही सोबतच. दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते पणएकमेकांना गमावण्याची भिती दोघांनाही होती. कारण प्रेम व्यक्त केल तर मैत्रीच नातं तुटायला नको... जे काही आहे ते त्यांना मनालाछान वाटत होत. असेच दोघांच्या सोबतीने दिवस मस्त आनंदात चालले होते. आता तेदोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते.एक दिवस खुशबु सूट्टीवर असली तर ईशानला ती दिसली नाही की चुकल्यासारख व्हायच. तो खुप तिला मिस करायचा... खुशबुच हीकाही वेगळ नव्हत तिलाही ईशानची सवयझालेली तो जर आला नाही ऑफीसला तर ती दुपारी लंचब्रेकमध्ये त्याला काॅल करायची.तेव्हा तिच्या मनाच समाधान व्हायच नाहीतलमनाला तिच्या त्याची काळजी वाटायची.
ईशानच्या घरी त्याच्या आईने लग्नाचा विषयकाढला. तर त्याने आईला काहीच म्हटल नाही आणि थेट ऑफीसला आल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी तिला समोर त्याने विचारल...ईशान - " खुशबु मला तु खुप आवडतेस आणिमाझ तुझ्यावर खुप प्रेम आहे... तर माझ्याशीलग्न करशील का ? " त्याने अस डायरेक्टविचारल्यामुळे तिला हसु आवरल नाही...खुशबु - " ये ईशान काय रे तु बरा आहेस ना ?एकदम अस डायरेक्ट लग्नाच विचारल..."ईशान - " अग खुशबू काय ग तु पण " तो थोडा वेळ शांत बसला... आता मात्र खुशबुला त्याच्या चेहर्याकडे बघुन समजल कीहा खरा बोलतोय.... तेव्हा तिने त्याला साॅरी म्हटलं... मग त्यानेही तिला सकाळी आईजे लग्नाच बोलली ते सांगितल. तिच्याविषयीमनातुन वाटणार प्रेम त्याने तिच्यासमोर व्यक्त केलं...तिलाही त्याच बोलण पटल. त्याच्याडोळ्यांवरून खुशबुला सगळ काही समजल.मग खुशबुनेही नकळत तिच्या मनात ईशानवरील प्रेम तिने तिच्या मनातील भावना व्यक्तकरुन दाखवल्या... तिचही आपल्यावर प्रेमआहे हे ऐकून ईशानचा चेहरा फुलला...तो तिला चिडवत म्हणतो मग आधी का नाहीसांगितल.... " मैत्री हे नात तरी आपल्यात राहावकायम " यामुळे नाही बोलू शकले... तो तिलातिच्या फेवरट कॅॅटबरी आणि गुलाबाच फुलदेऊन तिच्यासमोर गुडघ्यावर बसुन... ते तीनशब्द बोलतो.... "i love you Khushboo...🌹" ती त्याला उठम्हणते कुणि बघितील तर काय म्हणेल तो म्हणतो बघू देना... तशी ती ही लाजत त्याला" i love too ईशान म्हणते... दोघांना पण आज खुपच छान फिलिंग येत होती... गप्पांच्यानादात आज त्यांना खुपच उशीर झालेला.खुशबु रोज बसने जायची आणि ईशान तिलाबसस्टाॅवर ती बसमध्ये बसली की मग तोत्याच्या बाईकवर जायचा पण आज तो तिलाघरापर्यंत सोडवायला जातो... पहिल्यांदाचत्याच्या बाईकवर बसताना खुशबुला थोडीधाकधुक वाटत होती मनात, पण ईशानने तिला समजावल... तेव्हा ती बसली. त्याच्यासोबतती कधी घराजवळ येऊन पोहचली ते कळलदेखील नाही तो तिला बाय करून त्याच्या घरीनिघून गेला....
ईशानने पुन्हा रात्री खुशबुला लग्नाच तुकाहिच उत्तर दिल नाही म्हणुन विचारल तरतिने सांगितल की " तु मला लग्नासाठी विचारल मला खरच खूप छान वाटल आणितुझ्यासासखा मित्र जर आयुष्याचा सोबतीहोणार असेल तर कुणाला आवडणारी नाही "पण मला ना ईशान घरी विचारून तुला सांगेल.ईशाननेही तिला वेळ दिला आणि एवढी काहीघाई नाही तु आराशात सांजु शकतेस अस सांगितल्यावर तिलाही रिलॅक्स वाटल... पणआज तिला मनाला खुप छान वाटत होत...तिच मन तर ईशान बरोबर आयुष्याची स्वप्नेरंगवायला लागल होत. दोघेही एकमेकांनाआवडत होते. आता तर भेटण बोलण सुट्टीच्यादिवशी वेळ देण आणि समजुन घेणे या गोष्टीला दोघेही प्राधान्य देत होते. दोघांचहीलग्नाच वय होतच.... खुशबुने तिच्या घरीईशानविषयी सगळ खर सांगितल. तिच्याबाबांना त्याचा विचार करायला काही हरकतनव्हती. त्यांनाही खुशबुसाठी असाच मुलगाहवा होता. आणि तिच्याही फार अपेक्षा नव्हत्या.मग एकदा ईशान त्याच्या फमिलीसोबत खुशबुच्या घरी आला. खुशबुच्या घरच्यांनाही ईशान खुप आवडला. त्यांनी योग्य ती चौकशीकरुन , त्याच्या घरी जाउन आल्यानंतर खूशबुसाठी ईशानची निवड केली. दोघांच्या घरूनहोकार मिळाला तेव्हा तो क्षण खुशबु आणिईशानला खुप आनंद झाला... जणु त्यांचस्पप्न पूर्ण झाल होत... दोघांच्याही घरच्यांनीत्यांना समजुन घेउन त्यांच लग्न लावुन दिल.दोघांचा राजाराणीचा संसार सुरू झाला.दोघेही खुप खुश होते. लग्नाचे सुरूवातीचेदिवस दोघांनाही सोबत खुप enjoy केले.आता पुन्हा त्यांच ऑफीसच रोजच्या सारख रूटीन सूरू झाल. खूशबु आणि ईशानहे दोघेही त्यांना नवीन फ्लॅट घेऊन दिलेलातिथे राहत होते. ते ऑफीसपासुन जवळच्याअंतरावरच होत.
खुप छान आणि मजेत दिवस चालले होते.खुशबु ईशानला आवडत होती. तो तिच्या प्रेमातपडला आणि लग्नाच बोलल्यानंतर फार वेळन घेता दोघांनी लग्न केल. खुशबु सुंदर तरहोतीच पण ती तिच्या कामातही परफेक्ट होती.विशेष म्हणजे तिचा स्वभाव मनमिळाऊ होतात्यामुळे तिला सहज सगळ्यांना आपलस करता यायच... ऑफीसमध्येही तिचे खुप सारेफ्रेन्ड्स होते. तिच्याशी मैत्री करायला सर्वांनाआवडायच. सगळे तिच्याशी बोलायचे. या दोघांच प्रेमही दिवसेंदिवस वाढत होत. सुरूवातीचे दिवस खुप छान होते. खुशबु तर अगदी स्वर्गसुखाचा अनुभव घेत होती.ति खुप आनंदी होती की तिला ईशानसारखातिच्यावर प्रेम करणारा आणि समजुन घेणारालाईफ पार्टनर मिळाला. तिचही ईशानवर खुप प्रेम होत. ईशान आणि खुशबु एकत्रसुट्टी घ्यायचे. दोघेही ट्रिपला आणि लाँगड्राइव्ह ला जायचे. तिला निसर्ग पाहायलाफार आवडायच. त्यालाही फिरण्याच वेड होतच.व्हिकेंड पार्टीज ते आपल्या फ्रैंन्ड्स सोबतenjoy करायचे... दोघांचेही मित्र मैत्रिणएकाच ऑफीसमधले होते. त्यामुळे त्यांचनेहमी घरी येण जाण सुरू असे. मग ईशानयांना पार्टी द्यायचा... पण खुशबुलाच सगळकाही बघाव लागे. तस तोही थोडफार बघायचा.खुशबुला प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवलेली आवडे.तो मात्र इथे तिथे टाकुन द्यायचा आणि मगशोधत बसायचा... अश्या छोट्या छोट्या गोष्टींवरून नेहमी ते दोघे बोलायचे पण लगेचसगळ विसरून बोलायला लागायचे... नवरा बायकोच नातच अस असत... " तुझमाझ जमेना आणि तुझ्यावाचुनी करमेना "अशीच दोघांची अवस्था होती...
खुशबु ईशानला खुप समजून घ्यायची.पण त्याच वागणच बदलल होत. तिला वाटलकामाचा ताण असेल त्याला वेळ दिला पाहीजे आणि ती स्वतःहुन त्याच्याशी बोलायचीपण तो मात्र तिच्यावर कारण नसताना रागवायचा, चिडायचा... तरी ती काही बोलतनव्हती. थोडा वेळ त्याला शांत होऊ द्यायची.अस होत असायच कधीतरी पण सकाळीईशान खुशबुला काही बोलल कींवा रागवलातर त्याच लक्ष लागत नसे, तो संध्याकाळचीवाट बघायचा... तिला बोलण्यासाठी आणिमेसेजवर साॅरी म्हणायचा. तिही लगेच त्यालबोलायची. तिलाही त्याच्याशी अस न बोलताराहू शकत नव्हती. असेच दोघांचे हसत खेळत आपल रूटीनसांभाळत दिवस सूरू होते. ईशानची बदलीदुसर्या ऑफीसमध्ये झाली होती तस ते त्याचरोडवर होत. सोयीच होत त्यामुळे त्याचीहीहरकत नव्हती. मोठी पोस्ट मिळाली होती.कामाचा लोड वाढला होता. बराचसा नवीनस्टाफ सोबत काम करताना त्याला सांगावलागे. तो कामात जास्त बिझी राहू लागला.मिटींग्य वगैरे असत त्यामुळे कधी त्याला लेट व्हायच तर कधी तिला... तो रोज तिलाआधी सोडून ऑफीसला मग तो पुढे जाई.खुशबुवरही कामाची जबाबदारी वाढली होती.अलीकडे ईशान खुशबशी फार कमी बोलतअसे. तिलाच त्याच्याशी बोलाव लागे, मित्रांचेकाॅल आले की चांगलाच गप्पा मारायचा. खुप चिडचिड करत असे, छोट्या छोट्यागोष्टींवरून तो तिल रागवत अस. तिलाहीकळत नव्हत की ईशानला काय झलय ?ती बिचारी समजुन घेऊन प्रत्येक वेळेस त्याच्या कलेने घेत. तिला माहीत होत कामाचटेन्शनमुळे असेल कदाचित म्हणून ती त्यालाकाही बोलत नव्हती. तिच्यावर कामाचीजबाबदारी वाढली होती. कधी संध्याकाळचीमिटींग आणि ऑफीसच्या कामामुळे कधी कधी थोडा उशीर व्हायचा. मग घरी यायलाहीउशीर व्हायचा. आणि सकाळी काम असेलतर खुशबु ईशानच्या आधी ऑफीसला जावलागायच पण ती त्याला रात्रीच तस सांगुनठेवायची. ती त्याला प्रत्येक छोटी मोठी गोष्टशेअर करायची. पण हल्ली ईशान सांगुनहीउशीर झाला की खुप रागवायच, सगळ घरडोक्यावर घ्यायचा. चिडायचाही.
तिने त्यालादररोज walking आणि एक्सरसाईज करण्याचा सल्ला दिला ते त्याला फारस पटल नाही.प्रत्येक वस्तु त्याला हातात हवी असे , अश्याछोट्या गोष्टींवरुनही तो सकाळीच ओरडायचा.प्रत्येकवेळी उशीर झाला की तिला तो विचारतअसे त्याच सांगुनही समाधान होत नसे.हल्ली त्याच वागणच बदलल होत. लग्नाआधीचा ईशान तिला सारख आठवत होता.जो तिची खुप काळजी करायचा. तिला वेळद्यायचा. तो उशीर झाला तर खुप बोलायचापण खुशबु ऐकून घ्यायची. समजून घ्यायची.तिलाही ऑफीसच सोडून द्याव वाटत होत.
ईशान घरी उशीरा येऊ लागला. कधी तरड्रींक्स करून घरी परतायचा. मित्रांसोबतपार्ट्या करणे, उशीरा येणे नेहमीच झाल हौत.आधी तो अस वागत नव्हता... आणि त्यालाखुशबुने काही विचारल की तिला सुनवायचा.ती गप्पच राहायची. हे नेहमीच झाल होत.तो तिला उशीर झाल्यावर काहीपण बोलायचा.तिची धडपड त्याला नेहमी पटवुन देण्याचीअसायची. पण त्याला ते पटतच नव्हत. आधीचा ईशान आणि आताचा खरच कायझाल याला... ?? हाच तोच ईशान आहे नाजो तिच्याशी फोनवर कींवा समोरही तासनतासबोलायचा. तिला भेटण्यासाठी आतुर असायचा.तोच आता साध तिला " तु कशी आहेस ?हे देखील एका घरात राहुन विचारत नव्हता.साध्या साध्या गोष्टींचीही तो आता चौकशीकरत नव्हता. ती वेळोवेळी त्याच्याशी बोलायची.पण तो मात्र तिच्यापासुन दुर दुर जात होता.त्याच्या मनात गैरसमजाने जागा घेतली होती.तो रौजच काहीपण बोलायचा ती तरी सहनकरायची. कुणाला सांगणार ? तिचे आईबाबादुर राहत होते. तस फोनवर बोलण व्हायच.तिच्या जाॅबमधुन तिला वेळ मिळत नव्हता.त्याला तिच कुणाशी बोलणेही त्याला आवडतनव्हत. नेमक कस वागाव हेच तिला कळतनव्हत.
खुशबु चा ईशानवर खुप विश्वास आणिमनापासून प्रेम होत. ती त्याच्यापासुन दुर जाण्याचाविचारही करू शकत नव्हती. पण आता तिलावेगळीच नाही म्हटल तरी शंका येत होती." ईशान माझ्याशी अस का वागतोय ? हल्लीतो पहील्यासारख माझ्याशी बोलत नाही,वागतही नाही आणि जवळ पण घेत नाही.याच माझ्यावरच प्रेम तर कमी झाल नाही ना..."कदाचित आता याला मी आवडत नसेल,म्हणुन तर अस वागत नसेल ना माझ्याशी !छे ! छे ! अस काही नसेल, मी पण ना काहीविचार करते. तो अस वागुच शकत नाहीआणि अस काही असत तर त्याने आधीमला बोलून दाखवल असत. ती रोजच अससमजुन घ्यायची. जाऊ दे होईल ठीक, सुधारेल हा परत पहील्यासारखा ईशान मलाभेटेल या आशेवर ति आता रोजचा दिवसघालवत होती. कारण तिच त्याच्यावर प्रेमआणि विश्वास होता. पण ती त्याच्या रोजच्यावागण्यामुळे कंटाळली होती. रोजच ती सगळविसरून ती नवीन दिवस पुन्हा नव्याने सुरूकरायची. पण तो काही सुधरत नव्हता. तिच्याशी फक्त कामापुरतच बोलायचा. फक्तदोघे नावाला एका घरात राहायचे. सगळ अचानक अस झाल... जणू त्यांच्या संसारालादृष्टच लागली होती. त्याच्या आणि तिच्याआईबाबांनी आणि मित्र - मैत्रिणींनी या दोघांनासमजावल. पण फारसा फरक नाही पडला.
एक दिवस खुशबु ऑफीसला गेली तेघरी आलीच नाही.... ईशान संध्याकाळी ऑफीसमधुन आल्यावर परेशान होतो... खुशबु घरी नव्हती आली. ईशान खुप परेशान झाला. तो घरी आल्यावरत्याने तिच्या ऑफीसमधील मैत्रीणी आणिइतर फ्रैंन्डस ला काॅल करुन खुशबु आलीका कींवा काही बोलण झाल का विचारल ?तर सगळे नाहीच म्हणत होते. तिच्या बहीणीलाविचारल तर तिने काय झाल म्हणून ईशानलाविचारल असता, याने फोन कट केला. यालासमजल की ती तिकडेही गेली नाही. त्याच्याहीआईबाबांना विचारल, त्यांनी काळजी करू नको मैत्रिणीकडे गेली असेल कींवा तिच्या आईबाबांना फोन करून विचार आधी अससांगितल असता, त्याने खुशबुच्या घरी विचारल असता आईने ईशानला हो तिकडेआताच आल्याच सांगितल, तेव्हा खुशबु फ्रेश होण्यासाठी गेली होती. पण त्याला हेसमजल्यावर सुध्दा रात्री त्याने का गेलीस ?कींवा कशी आहेस हे विचारण्यासाठी खूशबुलाफोन देखील केला नाही. ती कंटाळून दोनदिवस माहेरी राहुन याव तेव्हा तरी हा सुधारेलपण आईबाबा तिला खूप बोलले... तिनेईशानला सांगायला हव होत अस न सांगतायेण चुकीच आहे. पण तीने त्याला नाहीकाही सांगीतल याची तिला चुक वाटत होती.तिने त्याला रात्री फोन केले, मेसेज केले साॅरीम्हटली पण तिकडून एकपण रीप्लाय नाहीआला. खुशबुला वाईट वाटत होत आपलीचचुक झाली का ? अस ईशानला न सांगतायेऊन... आता तो रागवला असेल पण हेतुतर चांगला होता माझा... मला माझा पहीलाईशान परत भेटेल, त्याला त्याच्या चुकांचीजाणीव होईल, आणि थोडा वेळ भेटला कीमनही शांत होईल हा विचार करून ती त्यालासोडून आली होती. दुसर्या दिवशी तिने त्याला काॅल केले.सकाळी उठल्यावर हा कसा आवरेल आणिवेळेवर ऑफीसला जाईल ना... वेळेवर काहीखाईल की नाही अशीच बरीच काळजी तिलावाटत होती. त्याने तिला साध विचारल सुध्दानाही याच तीला खूप वाईट वाटल. तिने स्वतःला सावरल... ती त्याला सोडूही शकतनव्हती, आणि इकडे ईशानला सोडून आल्यामुळे तिलाच त्रास व्हायचा. ती त्याच्यापासुनदुर जाण्याचा विचारही करू शकत नव्हती.तिच ऑफीस काम सुरू होत. ती माहेरवरूनचऑफीसला अपडाऊन करायची. त्याने तिलायेऊ नको अस सांगितल. तीच्या मनालाअजुनच वाईट वाटल. अधुनमधून तिच घरीचक्कर मारून यायची. ती नसताना घरसगळ ठीक आणि नीटनेटक दिसत होत, पणकाहितरी कमी जाणवत होती, तो जरी विचारतनसला तिला , तरी ती शेजारचे काका ,काकुंकडे त्याची विचारपुस करायची... हे दोघेत्यांच्या शेजारी राहायला होते. ते खुशबुला मुलीसारख पाहायचे. खूप लाड करायचे.एक महीना होऊन गेला तरी तो तिचे फोनआणि मेसेजला उत्तर देत नव्हता. तिने त्यालाभेटण्याचाही प्रयत्न केला. तो मात्र जवळूननिघून जायचा, दुर्लक्षित करून... त्याच हेअस वागण तिला त्रासदायक वाटे. ती त्याचऑफीस सूटल्यावर जायची त्याला भेटायलापण काही फायदा नाही तो बोलतच नव्हता.त्याच आता गप्प राहण तिला सहन होत नव्हत.
ईशानला खुशबुचा राग आला होता. तीत्याला न सांगता घर सोडून गेली होती म्हणून,पण तो तिला घरी ये असही म्हणत नव्हता.तो तिच्या अस सोडून जाण्याने दुखावला होता.पण त्याला फार ईगो होता. स्वतः तर फोनकरत नव्हता, आणि खूशबुने केलेला फोनहीघेत नव्हता. एक दिवस ऑफीसमधुन दुपारीघरी गेली, ईशान तैव्हा नव्हता. तिला शेजारचेकाकुंनी बोलवल. तिने सगळी परीस्थितीसांगीतली. दोघांनाही खुप वाईट वाटल. " रक्ताचच नात असल पाहीजे अस काही नाहीवेळेला जी नाती धावून येतात मदतीलातीच खरी...." तस खुशबू या दोघांना मुलीसारखी होती... ती तिथुन निघून जाते...त्यावर दोघे काका आणि काकु तिला बोलतात." दोघेही किती त्रास करून घेत आहेत...संसारात छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात.एकमेकांशी बोला... थोडा वेळ द्या एकमेकांनाआणि बोलुन सगळ साॅर्टआऊट करता येत."" पहील्यासारख सगळ छान करा... आम्हांलातुम्हांला पुन्हा एकत्र छान हसत खेळत बघायच आहे..." या दोघांनी खुशबुला सगळसमजुन सांगितल. आम्हीही मदत करू अससांगितल.... ईशान दिव्याच्या जाण्यामुळे त्याला आतावाईट वाटत होत. परेशान झाला होता.घरात कामाला बाई असली तरी बाकीचसगळ त्याला कराव लागायच, तो स्वतःची तयारी कींवा फाईल, एखादी वस्तु नाही सापडली तर तिला आवाज द्यायचा पण मगत्याला कळायच की ती इथे नाही आहे.तेव्हा त्याला तिची आठवण यायची...
एक दिवस ईशान ऑफीस सुटल्यावरघराजवळ असलेल्या गार्डनमध्ये जाऊन बसतो.त्याला शेजारचे काका काकु दिसतात... त्यांनासोबत बघितल. तो ही त्यांना ओळखायचा,बोलायचा... पण आज त्यांना अस पाहुनतो मनातच म्हणतो... " किती छान आहेत नाहि दोघे... किती तरी वर्ष झालीत लग्नाला...दोघांच पटत नाही कुठल्याच गोष्टीवरून पणतरी सोबत आहेत..." फक्त काही मिनिंटापुरतरागवतात... कधीच अबोला धरत नाही...हे का एकत्र आहेत तर त्यांच्या नात्यातीलप्रेम हे दिवसेंदीवस वाढतच होत... खरच नात असाव तर यांच्यासारख... ईशानआज त्यांच्यात हरवला होता...तो हे सगळखुशबुला दाखवणार होता.... पण ती आतासोबत नव्हती. तो एकटा राहुन कंटाळलाहोता. त्याला त्याच्या चुकांची जाणीव झालीहोती. " हे सगळ का अस का झाल ? " तेव्हा आपण खुशबू आपल्याला समजुनघ्यायची तरी का मी समजुन घेतल नाही.त्याला त्याच्या वागण्याच वाईट वाटत होत.तो स्वतःलाच दोष देत होता. तिच्याशिवायतो राहू शकत नव्हता. ति सगळ काम निऑफीस कस मॅनेज करत असेल ? हे सगळ त्याला आज समजत होत. त्याच्या वागण्याचा पश्ताताप झाला. तो रात्री घरीआला त्या दिवशी त्याला अचानक त्यांचेपहिल्याचे दिवस आठवले. परत एकदा तसचजगायच तो ठरवतो... पण खुशबु सोबतनसेल तर हा प्रवास कसा शक्य आहे.त्याला तिची आठवण आली की तो तिच्याफोटोशी मनातल्या मनात बोलायचा. ईशान तिच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडलाहोता... त्याचा तिच्यावर खुप विश्वास होता.तो आता सुधारला होता. तो आता तिलाघरी आणणार होता आणि पुन्हा नव्यानेत्यांच्या संसाराला सूरूवात करणार होता.
हे सगळ तो उद्या खुशबुच्या घरी जाऊनसंध्याकाळी तिला सोबत आणायच ठरवतो.तिच्यासाठी सरप्राईज म्हणून त्याने एक नॅकलस घेतल होत... तो हा विचारातं असतो.रात्रीचे नऊ वाजले असतील... त्याचा मोबाईलची रिंगटोन वाजली... तिकडून खुशबुच्याआईचा फोन होता... " कि तिला चक्कर आल्यामुळेहाॅस्पीटलला ॲडमीट केलय, तुम्ही येऊशकता का ? " त्यांनी ॲड्रेस सांगितला.ईशानने आईला धीर दिला. मी पोहचतो अससांगितल. खुशबुच्या आईने घाबरल्यामुळे ईशानला फोन केला... त्यावेळेस त्या एकट्याहोत्या. खुशबुला काही होऊ नये एवढचत्यांच्यासाठी महत्वाच होत. खुशबु रात्री बाहेर काहितरी आणायलागेली होती. जवळच खाली आसपासच...ती तिच्याच विचारांत चालली होती. समोरूनयेणार्या गाडीने थोडा धक्का दिल्यामुळेती पडली नि तिला थोड लागल... हे सगळकाही कळायच्या आत झाल. तिच्या आईलाबोलवल तेव्हा त्यांनी तिला जवळच्या हाॅस्पिटल मध्ये नेल... तिला फार लागल नव्हत.पण ती बैशुध्द झाली होती. म्हणून आईनेघाबरून ईशानला फोन करून कळवल होत.डाॅक्टरांनी खुशबुला चेकअप करुन ट्रिटमेंटसूरू केली. तिच्या डोक्याला थोडी झालेलीजखम त्याची ड्रेसिंग केली. खुशबुला असअचानक झाल्यामुळे तिची आई देवाजवळप्रार्थना करत होती. तेवढ्यात ईशान तिथेपोहचला. त्याने आईंना सगळ काय कसझाल ? विचारल. त्यांना धीर दिला ... " मीतुमच्यासोबत आहे. घाबरू नका... खुशबु ठीक होईल...." त्यांना खुशबुजवळ जायलालावल तो डाॅक्टरांशी बोलायला गेला. तेहीतिथेच होते. डाॅक्टरांनी सांगीतल की अस" सगळ अचानक झाल्यामुळे त्या थोड्याशा घाबरल्यामुळे चक्कर आली... बाकी तससगळ नाॅर्मल आहे. काळजी करण्यासारखकाही नाही. " ईशानला खुशबुजवळ जायलाकसतरी होत होत. त्याच्यामुळे झाल असत्याला खुप गिल्टी फील होत होत... पणआता खूशबुला माझी गरज आहे. तिचीकाळजी घेणे माझ कर्तव्य आहे सगळे विचारबाजुला ठेवून तो तिच्याजवळ जातो...आईनेच त्याला सांगितल नि त्या बाहेर गेल्या.एव्हाना खुशबुवर ट्रिटमेंट सूरू होती. एकतासभराने ति शुध्दिवर आली. तेव्हा तिलाजाग आली... तिला स्पर्शाची जाणीव झाली.बघते तर काय... ईशान तिच्पासमोर बसलाहोता. ती उठली नि त्याला अस समोरबघून तिला रडू आवरल नाही. त्याच्याहीडोळ्यांत पाणी तरळत होत... त्याने तिला" आता बर वाटतय का विचारल... तिनेमानेनेच होकार दिला..." त्यानेही तिला जवळघेतल. तिला शांत केल. क्षणभरच्या त्याच्यामिठीत तिला आता काय झालय याचाहीविसर पडला.... छान वाटल तिला... सगळविसरून गेली होती ती... तिच्या इतक्यादिवसांनतरच्या स्पर्शाने त्यालाही बर वाटल.तिची अवस्था बघुन त्याला मनातुन फारवाईट वाटल. त्याच्या डोळ्यांत पाणी आल. डाॅक्टरांना सांगायला हव. म्हणुन तो तिलाथांबवत त्यांना बोलवायला गेला. त्यांनी तिलापुन्हा चेकअप करून, सगळ ठीक आहे म्हणून डिस्जार्ज दिला. आईंना खूशबु बरीझाली आणि त्या दोघांना बघुन खुप छानवाटल.... तेव्हा तिघेही रात्रीच घरी आले.
दुसर्या दिवशी सकाळीच खुशबु आणिईशान त्यांच्या घरी आले. तो तिला सूट्टीघ्यायला सांगुन आराम करायला लावला आणितो आज तिची मनापासुन काळजी घेत होता.तिच्यासाठी स्वतःच्या हाताने त्याने आजपहील्यांदा जेवण बनवल... तिला तर खुपआनंद झाला... तिला तिचा पहीला ईशानपरत मिळाला यामुळे खुप छान वाटत होत.त्याने आज तिला त्याने आणलेल गिफ्ट दिलतिही खुप खुश झाली. दोघेही आज इतक्यादिवसानंतर खुप बोलत होते. जवळ आलेहोते... आज ईशान खुशबुची... माफी मागतहोता... " साॅरी खुशबु, मी चुकलो मला मान्यआहे पण... इथुन पुढे काही चुक झाली तरमला शिक्षा कर पण अस न सांगता सोडूनयेऊ नकोस... " मला आता पुन्हा नव्यानेसुरूवात करायची आहे, तुझ्यासोबत राहायचआहे. झाल गेल सगळ विसरून मला माफकर ना....पुन्हा अस कधीही नाही होणार...त्याला अस बोलताना पाहुन तिलाही भरूनआल... तिने त्याला जवळ घेतल नी सांगितल..." ईशान , अरे वेड्या मिही तुझ्याशिवाय नाहीराहू शकत. मी कशी राहत होते ना माझमला माहीत..." प्लीज मी तुला न सांगताअशी निघून गेले... त्यासाठी खरच साॅरी..तिने त्याला घट्ट मिठी मारली नि सांगितल की मी ही तुला सोडून कधीच जाणार नाही...दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले...ही दोन प्रेम करणारी पाखरं आज एक झालीहोती...
ईशान आणि खुशबु यांनी एकमेकांनावेळ दिल्याने त्यांच नात पहिल्यासारख झाल.त्यांनी सगळ विसरून पुन्हा नव्याने संसाराला सुरूवात केली... दोघेहि पहील्यासारखं आनंदाने राहू लागले... नात्यामध्ये ओढनिर्माण झाली की प्रेमाचा वेल अधिकचफुलत जातो.... दोघांच्या संसाराची गाडीपुन्हा रूळावर आली होती... जणू दोघांच्यानात्यातं पुन्हा मोगरा फुलला होता.... समाप्त.... काही नाती वर्षानुवर्षे टिकून असतात...ती एकाच गोष्टीमुळे... विश्वास....दुरावा कोणतही नात संपवत नाही आणिजवळीक कुठलही नात घट्ट करत नाही.आपण जस मोबाईल हँग झाला कीरिस्टार्ट करतो... तसच नात्याच्या बाबतीतनात हँग झाल की एकदातरी restart करून बघावं...
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''