मित्र
मित्र
मित्र म्हटले की आपल्या चेहऱ्यावर गोड हसू कस आणायचे हे ज्याला अचूक ठाऊक असते. रोहन आणि रमेश एकमेकांचे घनिष्ठ मित्र. घराजवळच राहत असल्याने शाळेत देखील एकाच होते.
दोघांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नव्हते. शाळेतून घरी आल्यावर अभ्यास करायला एकत्र संध्याकाळी खेळायला एकत्र. दोघांची जोडी जय वीरु प्रमाणे प्रसिद्ध होत होती.
दोघांना सणासुदीला एकाच ताग्यातले कापड आणून शर्ट शिवला जायचा. रमेश च्या बाबांची बदली होती. आता रमेश आणि रोहनची कायमची ताटातूट होणार होती.
दोघांना कसतरीच वाटत होते. इतकी वर्ष एकमेकांसोबत आहोत. आता थोडे कठिण होईल सारे. रमेश निघून जातो.
एके दिवशी रोहन रमेशला भेटायला येतो. त्याला आपल्या मित्राची आठवण येत असते. तिथे गेल्यावर रमेश घाबरलेला आणि आई-वडिल ही फारशे पूर्वी सारखे बोलताना आढळले नाही.
काहीतरी लपवत होते हेच खरे. रमेशच्या बाबांना ट्रान्सफर देऊन पैशाच्या नावाखाली उकळताना काही गुंड घराच्या आसपास फिरताना दिसले. पोलिस तक्रार केली तर रमेशला जिवंत सोडणार नाही असे देखील सांगण्यात आले.
रोहनने वीरूबरोबर असताना जयने घाबरायचे नाही असे म्हणत रमेशला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवून पुन्हा घरी परत आणले.
मित्रत्वाचे खरे दर्शन रोहनच्या रुपात पाहण्यास मिळाले. संकटातून आपल्या मित्राला वाचवले. रमेश घरी परत आल्याने पूर्वीसारखीच मजा, मस्ती चालू होती.
