Anjali Bhalshankar

Fantasy Inspirational

3  

Anjali Bhalshankar

Fantasy Inspirational

महाराष्ट्र देशा.....

महाराष्ट्र देशा.....

5 mins
199


राकट देशा कणखर देशा, दगडां च्या देशा. नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा.🌹अशा धारदार शब्दांनी कवी गोविंदाग्रज यांच्या सह अनेक साहित्यिकांनी आपल्या भारदस्त शब्दसुमणांनी🌹 गौरवाचा साज चढविलेला असा आपला मंगलमयी पवित्र महाराष्ट्र देश.आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏आजच्या दिनी एकोनाविसशे साठ साली द्विभाषिक अखंड राज्य अर्थात आपल्या महाराष्ट्र राज्याची खरया अर्थाने निर्मिती झाली. लाखो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वतंत्र भारताची मुहूर्तमेढ रोवली मग निरनिराळ्या राज्याची पुनर्रचना करण्याच्या प्रक्रीयेला वेग आला.द्विभाषिक प्रांतांचे शक्तिशाली राज्यात रूपांतर व्हावे म्हणून अनेक दिग्गजापासून सर्वसामान्य जनता एकत्र आली.अनेक नेते पत्रकार लेखक बुद्धीजीवी लोकनेते यांनी वैचारीक पातळीवर लढा दिला.यासह मराठी भाषिक समाज एकत्रीत आणण्यासाठी एस एम जोशी प्र .के अत्रे काॅमरेड श्रीपाद डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे या सारखे समाजिक विचारवंत एकत्र आले .सयुकत महाराष्ट्र चळवळीचा इतिहास लिहिताना लोकशाहीर अन्नाभाऊ साठे क्रांती सिंह नाना पाटील कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा उल्लेख केल्याशिवाय पुर्ण होणार नाही कारण शाहीर अन्नाभाऊ साठे अमर शेख नारायण सुर्वे यांनी आपल्या शाहीरी लेखणीतून काव्यातून सर्वसामान्य कामगारांना व जनतेच्या भावनांना हात घातला म्हणूनच सत्तेला मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीला नकार दिला तेव्हा सर्वसामान्य जनताही पेटुन उठली आंदोलनात सहभागी होऊन सरकारचा तीव्र विरोध केला ज्याचा निषेध करून आंदोलन मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दिलेल्या गोळीबाराच्या आदेशामूळे एकशेसहा आंदोलक हुतात्मे झाले.अशा बलीदानातुन आपले राज्य विसाव्या शतकाच्या मध्यावर पुन्हा नव्याने ऊभे राहिले.........🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂                      

संयुक्त महाराष्ट्र भीमराव रामजी आंबेडकर यांचे योगदान 🙏संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अनेकजण रस्त्यावर ऊतरून आंदोलने करीत होते डॉक्टर आंबेडकर मात्र कायद्याची लढाई लढत होते या महापुरूषाने सुरवातीपासून मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे ही प्रखर व ठाम घेतली 1946पासुन आंबेडकर पुराव्यांसह ही गोष्ट सांगत राहीले तो नाजुक प्रांतिक आणीबाणीचा काळ होता गुजरात मुंबईला तोडण्याच्या बेतात होता ते अशक्य आहे हे ध्यानात येताच मुंबई हे केंद्रशासित प्रदेश करण्याचे पत्रक केंद्राने जारी केले यांसह वेगळे विदर्भ राज्य स्थापन करून उर्वरित महाराष्ट्र गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला.हा डाव सफल झाला तर महाराष्ट्राचे अस्तित्वच नष्ट होणारे शडयंतर आंबेडकरांच्या ध्यानी आले म्हणून मुंबई महाराष्ट्राचीच आहे व संयुक्त महाराष्ट्र राज्य व्हावे म्हणून आंबेडकर यांनी इतिहास, कायदा अभ्यासून पुराव्यासह सबळ युक्तिवाद करून मुंबई महाराष्ट्राचीच कशी आहे हे सिद्ध केले यासाठी चालुक्य ते शिलाहाराचे दाखले दिले 1941 च्या जनगणनेनुसार 51%मराठी लोक मुंबईत आहेत हे सिध्द केले छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नंतर 1671 मध्ये ईंग्रज भारतात आले त्यावेळेस ईंग्रजांनी गुजराती लोक महाराष्ट्रात आणले त्यांच्या मध्ये झालेला करार आंबेडकरांनी शोधला व ठणकावून सांगितले की जरी इंग्रज फ्रेंच, डच,हे भारतावर राज्य करण्यासाठी आले तसेच गुजराती महाराष्ट्रात व्यापार, इंग्रजांच्या पदरी, कारकून,मुनीम व दलाल म्हणून आमंत्रित केले गेले त्याबद्दल सर्व सुविधायुक्त जीवन व संरक्षण ईंग्रजांनी त्यांना दिले ईंग्रजा प्रमाणे गुजरातयांनी इथ बस्तान बसविले जर इंग्रज निघुन गेलेत तर गुजरातयांनी ही मायदेशात निघुन जावे असे आंबेडकरानी सुचविले, जसे की महाराष्ट्रा प्रमाणे कलकत्ता व बिहार या ठीकाणीही बरेच गुजराती लोक स्थायिक होते मग आंबेडकर प्रश्न विचारतात,म्हणतात प.बंगाल व उत्तर प्रदेश सुद्धा गुजरातला जोडणार का?महत्वाचे म्हणजे मुंबईत बहुतांश मजुर,कामगार,गिरणी कामगार वर्ग मराठी आहे मुंबई साठी वीज पाणी व नैसर्गिक साधनसंपत्ती महाराष्ट्राची आहे मग कोणत्याही प्रदेशाची मालकी ठराविक परदेशाकडे आहे हे सिद्ध करायला, थोडक्यात मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे सिद्ध करण्यास या गोष्टी सबळ पुरावे देतात मग मुंबई गुजरातची कशी?अशा प्रकारे आंबेडकरांनी दिलेले दाखले व पुरावे ग्राह्य धरून मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे मान्य करावे लागले अशाप्रकारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील मोलाचे योगदान विसरता येणार नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

होय नव्यानेच कारण बलीदान त्याग व शुरवींराची शकती व भक्ती ची परंपरा हजारो वर्षापासून या भुमिने पाहीली आहे.महाराष्ट्र अवघ्याअवघ्या देशातच नाही तर जगात आपली प्राचीन सांस्कृतिक शौर्याची परंपरा दाखवून दिली आहे. थोर संतांची परंपरा लाभलेली पढरीची वारी हे त्यापैकीच शिस्तीचे दैदिप्यमान उदाहरण आहे. संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव चोखामेळा जणाबाई यापासून लोककलयान व खरा धर्म जागृतीचे सुरू झालेले कार्य अगदी अलीकडे गाडगेबाबा पर्यंत सामाजिक ऐकयाचा संदेश जपणारी व अध्यात्मिक समता सत्य व त्याग शिकवणारी आहे.🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂छत्रपती शिवरायांनी मराठे शाहीची मुहूर्तमेढ याच भूमीत रचली तुकड्या तुकडयात विखुरलेला ऊधवस्त झालेल्या सह्याद्री च्या कडेकपारयात मराठा तितका मेळवावा ची साद दिली बसुजनांना साथीला घेऊन स्वराज्याची स्थापना केली.महाराणी जिजाऊ माँसाहेब शाहाजीराजे यांसह अनेक मर्द मराठी मावळ्यांची साथ महाराजांना लाभली नव्हे त्याशिवाय स्वराज्य अशक्य होते असे हे वीर तानाजी मालूसरे संताजी घोरपडे जीवा महाला सूर्याजी पिसाळ ऊमाजी नाईक बहिरजी नाईक इत्यादी सरदारांनी प्रसंगी जीवाची बाजी लावून सह्याद्री च्या कुशीतील महाराजांनी निर्मान केलेली गड किल्ले व दौलतीचे राखण केले. पूढे छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज महाराणी यसुबाई ताराराणी अहिल्याबाई इ.दिंनी मोलाचे योगदान महाराष्ट्र रक्षणया दिले. ☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺बारा कोटी जन संख्या असलेले आपले महाराष्ट्र राज्य तीनशेसात हजार सातशे तेरा की मी क्षेत्रफळात विस्तारले असुन सातशे वीस की मी लांबीचा समृद्ध असा सुजलाम सुफलाम .दक्षिणोत्तर विस्तारलेला समुद्र कीनारा आपलयाया लाभला आहे.छततीस जिल्हे व अठठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायती असलेले हे अखंड राज्य ऊत्तर पूर्व छततीसगड, मध्य प्रदेश व दक्षिणेला कर्नाटक गोवा तर वायवयेला गुजरात दादरा नगर हवेली असे विखुरले आहे.कोकण पुणे नाशिक औरंगाबाद नागपुर अमरावती तसेच मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व प्रादेशिक विभागातील देशातील मुख्य आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर असे पसरलेले आहे.विविधतेने संपन्न राज्यात अनेक निसर्ग रम्य व प्राचीन गड किल्ले, सरोवरे लेणी मंदिरे व समुद्र कीनारयावर वसलेली अलीबाग, गणपती पुळे, रत्नागिरी दापोली निसर्ग रम्य विलोभनीय ठीकाणे आहेतच यासह कास पठार लोनार सरोवर वेरूळ अंजठा लेणी इत्यादी जागतिक दर्जा असलेली स्थळे ही आपलयाला लाभलेली आहेत.संपूर्ण देशाचा आर्थिक वाटा मोठ्या प्रमाणावर चालवणारे ऊदयोग मुंबईत आहेत राजकीय औदयोगिक आर्थिक व्याप असलेले शहर मुंबई व सारया जगाला भुलविणारी बाॅलीवुडची मायानगरी आपल्या मुंबईत अर्थात आपल्या महाराष्ट्रात आहे. 😘😘😘😘😘😘😘😘😘पहीले मुख्यमंत्री स्वर्गीय मां यशवंतरावजी चव्हाण या पासुन सध्याचे मा.मुख्यमंत्री ऊदधवजी ठाकरे यापर्यंत सारयांनाच विविध राजकीय सामाजिक घडामोडींना सामोरे जावे लागले आहे. ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्र उभारणी मध्ये महाराष्ट्रातील ऊदयोग कारखाणे शेतीने नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे.येथील गिरणी कामगारांचा लढा एकुनच जागतीक पातळीवरच्या कामगारांच्या पिळवणुकीच्या विरूदधचा लढा यशस्वी ठरलेला दिवस म्हणूनही आपण आजचा दिवस जागतिक कामगार दिन कामगार कष्टकरी यांच्या न्याय हक्काचा दिवस म्हणूनही ऊत्साहाने साजरा करतो🙏🙏🙏🙏🙏🙏असा हा दैदिप्यमान प्राचीन सांस्कृतिक सामाजिक प्रेरणादायी व शाहु फुले आंबेडकरांचा, महात्मा फूले सावित्री बाई फुले पासून आलीकडे नरेंद दाभोळकर गौरी लंकेश इत्यादी पर्यंत निधड्या छातीने सत्याची लढाई लढणारया बुद्धिवंत विचारवंत सुधारणावादी पुरोगामी महाराष्ट्राची कीर्ती जगभर अखंड वाढतच राहो🙏🙏🙏🙏🙏असा हा महाराष्ट्र देश बहूजणांचा कष्टकरयांचा शेतकरयांचा लढवय्या विचारवंताचा महाराष्ट्राचा वारसा आपण सारयांनीच जपायला हवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy