गब्बर
गब्बर
गब्बर ची गावात खुपच दहशत असते. त्याचे नाव घेतले तरी लोक घाबरतात. जेव्हा एखादे मुल रडते तेव्हा त्या मुलाची आई गब्बरची भिती दाखवून गप्प करते म्हणते शांत बस नाही तर गब्बर येईल. गब्बर लोकांकडून शेतसारा वसूल करतो.. धंदे वाईक लोकांकडून लाच कर घेतो. पोलिसही ह्या गबबरला घाबरतात. गावातल्या बायका, मुलींवर अन्याय करतो.. जो त्याच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडतो त्याचे पूर्ण कुटुंब तो मारून टाकतो. आणि त्या माणसाचे हात पाय तोडतो म्हणून सर्व लोक त्याचा अन्याय गप्प गुमान सहन करतात..
असाच गब्बरच्या अन्यायाला त्या गावचा ठाकूर बळी पडला असतो. त्या ठाकूरच्या तरुण मुलाची गब्बर ने हत्त्या केली असते. आणि त्याचे दोन्ही हात तोडलेले असतात.. त्याला वाटते आता ठाकूर आपले काही बिघडू शकणार नाही. पण असे होत नाही ठाकूर दोन साहसी तरुण जय आणि विजय ला शोधून आणतो आणि गब्बर चा बदला घेतो. त्याला ठार मारतो.