#विरह
#विरह
कसं जगू तुझ्याशिवाय
आज मला कोड पडलं
असं काय नात आपलं
की मन तुझ्यातच गुंतल
तू सोडून चाललीस
हे सहन होत नाही
डोळ्यातले अश्रू लपवले
मात्र मनातले लपत नाही
फक्त या विचारानेच
एक क्षण युगासारखा भासे
जीवनातली प्रत्येक गोष्ट
अर्थशून्य वाटे
कारण प्रत्येक वेळी सोबतीची सवयच मला पडली
मैत्रीच्या पलीकडली नाती आपल्यात जुळली
मला नाही पहायचं
कधी तुला रडताना
म्हणूनच हसत अलविदा
करेल तुला जातांना
आणि जाताना तुझ्याजवळ
एवढच मागेन
विरहाच्या ह्या अग्नीत
मी एकटीच जळेन का?
फक्त सांग मनापासून
त्यात तुझी सोबत असेल ना?