शिव गाथा
शिव गाथा
ते नाव जे माणसातल्या शूरवीराला जागे करते,
आणि ते तेजस्वी व्यक्तिमत्त्व ज्यांच्या मुळे स्वराज्य स्थापिले जाते,
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
ती गाथा जी अनेक वेळा सांगितली जाती,
पण प्रत्येक वेळा नव्याने उलगढती
“मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही”,
हा विचार मांडणारे फक्त एकच राजे शिवाजी
तलवार तर सगळ्यांच्या हाती होती,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण ज्यांनी ह्याला एकत्र आणले आणी स्वराज्य स्थापिले,
ते म्हणजे शिवाजी
छत्तीस हत्तीचें बळ असणारे ,
आणि मोगलांना त्रस्त करणारे,
ते म्हणजे शिवाजी
आज गरज आहे त्या शिवरायांची,
आणि शिवरायांच्या मावळयांची,
परत एकदा त्या शिव विचारांची
महणजे “स्वराज्याची”