शब्दच जीवन
शब्दच जीवन
शब्दातून शब्द वाढतात ।
पटले तर '' संवाद " नाहीतर '' विवाद " ॥
शब्दातूनच शेवटी ''निःशब्द'' होतो ।
समजून घेतल्या तर ''भावना '' नाहीतर ''वेदना'' ॥
शब्दच होऊ शकतात ''शस्त्र'' आणि ''ढाल'' ।
शब्दच होऊ शकतात सन्मानाचं ''श्रीफळ आणि शाल'' ॥
शब्दच आहेत साहित्याचे पंचप्राण ।
शब्द जरा जपूनच वापरावेत, ते आहेत रामबाण ॥
राष्ट्रभक्तीने ओथंबलेले शब्दच रचतात स्वातंत्र्याचे '' समरगीत'' ।
ईश्वरभक्तीने परिपूर्ण शब्दच रचतात ''अभंग'' आणि ''भक्तीगीत" ॥
कोठे किती शब्द वापरावे हे आहे आपल्याच हातात ।
शब्दांनीच राखू शकतो नेहमी गोडी सगळ्या नात्यात ॥
शब्द म्हणजे अलंकार, शब्द म्हणजे रत्नं ।
हे धन श्री. संत तुकारामांचे, माझे तर फक्त प्रयत्न ॥