|| मैत्री ||
|| मैत्री ||
दोन मनांचं मीलन
जीवनाचं खरं धन;
मैत्री म्हणजे सुखांची
मनसोक्त उधळण.
मैत्रीचं रोपटं जेव्हा
मनात फुलू लागतं;
कुबेरी धनही तेव्हा
क्षुल्लक वाटू लागतं.
विश्वासाच्या पायावर
सदैव उभी असते;
कोणत्याही बंधनात
मैत्री बंदिस्त नसते.
संकटांशी लढताना
वादळ होऊन येते;
जीवनाच्या लढाईत
मैत्री तलवार होते.
सगळ्या नात्यांना आता
लागले आहे ग्रहण;
कोणीही कोणाचं नाही
जुगार झाले जीवन.
सुंदर जीवनासाठी
विश्व वाचले पाहिजे;
विश्व वाचविण्यासाठी
मैत्री केलीच पाहिजे...!