बालपणीचे ते दिवस
बालपणीचे ते दिवस
कसे गेले ते बालपणीचे रम्य दिवस
कळलेच नाही
आठवणींचे रंग हातावरी ठेवून
ते नाजूक फुलपाखरू
कधी उडून गेले कळलेच नाही
आई वडिलांची करंगळी धरून चालता चालता
कधी मोठे झालो कळलेच नाही
उनाडपणाला त्या बालपणीच्या
जाणिवेची किनार कधी आली कळलीच नाही
हवीहवीशी ती नाती
कधी विसरून गेलो कळलेच नाही
आयुष्याच्या या पानावर
आठवणीचे गोड क्षण कधी उमटले
कळलेच नाही.. कळलेच नाही
झालो कधी मोठे आले आता नविन क्षण वळण नवे आले आयुष्याचे
कळलेच नाही कळलेच नाही
फुलपाखरावानी हिंडलो आजवर
आता आली जबाबदारी, उभ राहु तरी निश्चयाने.
कधी चुकलो तर माफी असावी आम्हांस
निरोप घेतो आता आपुला.
आज्ञा असावी आता आम्हांस.
