ठिकाण
ठिकाण
नेहमीच्या रस्त्याचे ठिकाणी जाताना मला त्या जागेविषयी मनामध्ये सदा भीती निर्माण होत असे गावात त्या ठिकाणी भूत , पिशाच्छ काही नाही मी हे सिद्ध करून दाखवतो असे गावकऱ्यांना चॅलेंज देवून मी अमवशेच्या रात्री जावून दाखवतो म्हणून निघालो होतो मित्राबरोबर रस्त्याने जात असताना अचानक टूव्हीलर वर जात असताना टूव्हीलर पंचर झाली आणि त्याठिकाणी गाडी साईटला लावली पंचर काढता आलं नाही म्हणून गाडी लोटत जायचं ठरवले . मात्र दुकान जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावर होते त्यामुळे दुसरा पर्याय नव्हता एका निर्भिड , मन तुटायची अनेकांनी जीवाची बाजी लावली .आज मात्र आमवश्या आणि योगायोगाने अंधारी रात्र होती रस्त्याच्या कडेला कोणतेहि प्रकारचे लाईट प्रकाशाची सोय नसल्याने अंधारात चाचपडत सापडत रस्ता काढत आम्ही दुकानाचे दिशेन वाट काढत पुढे चालत होतो आणि अचानक रस्त्याने कुत्रा आमच्या गाडीवर धडकला गाडी पडली उचलली पुन्हा चालु लागलो , दुर्दैवी म्हणावा की योगायोग परत काही क्षणात अचानक पुढे एक पांढरी आकृती येताना दिसली काळजात धस्स झाल आणि त्या जागी विषयी मनात नेहमी असलेली 'भी 'ती असेल कि या ठिकाणी गावांमध्ये पसरलेली अंधश्रध्दा ? त्या 'ठिकाणा 'विषयी दशहत व ग्रह ती घालवूव एक आदर्श निर्माण करू या साठी आम्ही जणू पैजेचा विडा उचलुन आलो होतो दुसऱ्यांदा गाडी पडली व तिसऱ्यांदा तर समोर पांढरी आकृती येताना दिसली मी अतिशय घामाघुम झालो मित्राचा बीपी वाढला . हृदयाची धडधड वाढली गाडी लोटतानां सुद्धा घाम यायचा अतिशय घाम मी कशीबशी गाडी लोटत होतो मात्र मागे बघितलं तर शंभर मीटर पेक्षा जास्त अंतर चालू शकत नव्हतो इतकं भीती आणि भयाने , पांढरी आकृती ही आमच्या कडे येतांना आणि मोठी होताना दिसत होती मनामध्ये असलेली भीती अजून वाढली मित्र डोळे बंद करून गाडी ढकलत होता भीती ने त्याला चक्कर आली व खाली पडला 💀 आता मात्र माझे गात्र गळाले आणि पौर्णिमेला असं का घडून येत नाही हा भ्रम नष्ट करण्यासाठी एक विडा उचलुन लोकांनी त्या जागेवर येऊन दाखवतो म्हणून मित्राला सोबत घेूवून आलो आज मला या रात्री या ठिकाणाहून जावून आलो असे दाखवतो असे चॅलेंज करू मी गावातून निघालो होतो. मात्र ? गावात एक ते दीड पर्यंत एक सव्वा तासात नाही पोचलो तर शंभर टक्के विश्वास हा ठाम होता की हे परत येऊ शकत नाही . त्यांचा मृत्यु झाला असेल हा गावकऱ्या चां विश्वास ? पण मित्राला चक्कर आले त्याला बघून मी ही घाबरलो आता त्याला दवाखाण्यात जाणे गरजेचे होते. मला तर मित्राला पाहील्यावर गाडी सुद्धा स्टँडवर लावता येत नव्हती गाडी आडवी केली आणि मित्राकडे धावलो त्याची शुद्ध हरपली होती हृदयाचे ठोके वाढले होते त्याचं काही बरं वाईट झालं तर ?उद्या तू जाशील मला पण मनामध्ये शंका वाढली त्याला पाठीवर टाकून कि गाडीवरती त्याला नेऊ शकत नव्हतो गाडी पंचर होती आणि त्याला पाठीवरून नेल्या शिवाय मला पर्याय नव्हता 2 ते 5 किलोमीटरवर कोणत्या प्रकारचा वाहन त्या रस्त्याने जात नव्हते . त्याला वाचवण्यासाठी भरभर चालू लागलो चालत असताना चप्पल चा अंगठा तुटला गडबडीमध्ये पडलो पडल्यामुळे त्याला त्याला मार लागला शेवटी त्याला गाडीवर टाकले व गाडी लोटु लागलो पण . गाडी लोटतानां पाय ओढला जात होता ' जितक्या जोराने गाडी लोटली कि तेवढया जोराने पाय ओढले जात त्यामुळे दोघेही पडलो व आमच्या वर गाडी मला तर खात्री झाली आपला शेवट झालाच भितीपोटी माझी शुद्ध हरपली पहाटे सर्व गावकरी त्या ठिकाणी आमचे मुडदे घेणे साठी आली होती ? जवळ येऊन पोहोचले पाहतात तर आमचे हृदयाचे ठोके चालु होते व माझी पॅन्ट गाडीच्या स्टडं मधे अडकल्यामुळे आम्ही पडलो होतो व भिती व पूर्वग्रह यामूळे ?त्यांनी त्वरित हॉस्पिटलमध्ये नेले जाग आली तेंव्हा आठवले आणि जेव्हा जाग आली तेव्हा मात्र दुपारचे बारा वाजले होते मित्र आणि मी एका बेडवर आणि दोघांना सलाईन चालू होती मित्रा माझा पाय अडकल्यामुळे माझ्या मनामध्ये असणारे भीतीमुळे चक्कर आल्यामुळे मी पडलो होतो तुम्ही आता मला या ठिकाणी दिसणाऱ्या आदिशक्तीने पकडले आणि मी आता चालणार नाही या भीतीपोटी काय झाले होते जेव्हां मला मित्रांना भेटलेल्या हकिकत सांगू लागले विश्वास बसत नव्हता स्वतःला बचावासाठी आम्ही विश्वास होता .मात्र या ठिकाणी त्या ठिकाणी होणारे एक्सीडेंट विशिष्ट पद्धतीने एक किंवा दोन मृत्यू हे निश्चित घडलेल्या असायचे आमचे वयाचे साठ वर्षे आम्ही ऐकत आहोत तुमच्यासाठी असंख्य बलदंड हिम्मतवार प्रकारचे विश्वास नसणारे. तंत्रज्ञानावर जगणारी स्वच्छ अदृश्य शक्ती याच्यावर विश्वास नसणारे तुमच्यासारखे अनेक प्रयत्न केले एकही प्रयत्न करणारा परत आला नाही व इतरांना दाखवू शकला नाही की ती जागा किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शक्ती नाही .किंवा दुर्दैवाने अशा घटना घडतात हे सिद्ध करु शकलो नाही त्यामुळे तुम्ही परत परत प्रयत्न करू नये हीच आमची अपेक्षा जीवन आनंदाने जगावे व त्या ठिकाणाविषयी कोणत्याही प्रकारची कारणे खोटं ;प्रतिष्ठित मी तुम्हाला जीवांची काळजी घेण्याची सूचना देऊन निघाले.मात्र त्यांना सांगू शकत नव्हतो ठिकाण वाईट आहे किंवा झाले किंवा केले याविषयी संदेश देऊ शकलो नाही . मनामध्ये सतत शल्य राहिल्याची खंत मनामध्ये I समाजामध्ये कायम आहे . व या प्रकारची कल्पना खुळी ठरवण्याचा प्रयत्न सुद्धा निष्फळ ठरला.मी हतबल झालो.