Meenakshi Kilawat

Others Inspirational

4.3  

Meenakshi Kilawat

Others Inspirational

स्वातंत्र भारत असा असावा

स्वातंत्र भारत असा असावा

4 mins
1.3K


    आपण आज स्वातंत्र भारतात वास्तव्य करीत आहोत.ज्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळी आपण खुप लहान किंवा या जगात आलो नव्हतो आपला जन्मच झालेला नव्हता, पारतंत्र्यात त्यावेळी काय परीस्थिती असेल ही गोष्ट आपण अनुभवली नाही म्हणुन आपणास नाही कळणार पारतंत्र्यात आपल्या लोकानी कशी अवहेलना भोगली होती. हा सर्व आखो देखा हाल दृष्टांत त्या पारतंत्र्यात राहणाऱ्या लोकांनाच माहीत असेल. फक्त आपण त्याची जाणिव ठेवणे महत्वाचे आहे.


१५ ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सर्व मिळून उत्साहाने आणि आनंदाने साजरा करित होतो जयघोष करीत होतो, राष्ट्रध्वज तिरंग्याचा मान करत होतो. आपल्या भारतात हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जात असतो. यादिवशी शाळा, महाविद्यालयात, गावात, नगरात, चौकात, शासकिय कार्यालयात, सार्वजनिक अनेक ठिकाणी 15 आगष्ट दिवशी ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाचा कार्यक्रम होतो. मिरवणुक काढत असतो. परंतू मोठे होताच या सर्व गोष्टी विसरून जातोय ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे.


  जुन्या काळाचा विचार करा तेंव्हा आपल्या पुर्वजाची पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्यासाठी किती तळमळ होती.अत्यंत कष्टप्रद व दुखद वाटचाल होती. स्वातंत्र्यासाठी त्यांनी निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या होत्या.पुढील पिढीसाठी त्यांनी स्वातंत्र्याची नवीन पहाट आणली त्या थोर पुरुषांनी आपले जीवन स्वाहा केले आणि हसत हसत फासावर चढले त्यांच्या देशभक्तीला काय म्हणावे किती जागृत देशभक्ती त्यांच्यात सामावलेली होती. आणि त्यांनी सर्व पुढील पिढीसाठी केलेलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.


 पारतंत्र्याची पुढील पिढीवर छाया नसावी ही महत्त्वाकांक्षा घेऊन पुर्वजांनी क्रूरतेशी अमोरा समोर लढा दिला होता. ही त्यांची मानसिकता होती म्हणून थोर पुरुषांमध्ये त्यांची गणना झाली आणि बहूतेक आजच्या पिढीला स्वातंत्र्यदिवस कश्यासाठी आहे हे ही माहित नसावं यापेक्षा दुर्दैव कोणते असेल. त्यांनी आपल्या सुखाला मूठमाती देऊन आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले ही खूप अमूल्य देणगी होती पण ती आपण तरुण पिढीला त्याचे काही व किती कौतूक आहे. त्या स्मृतीतरी सांभाळता येतील काय? हे साशंक चित्र आज  देशभक्त लोकांना विचलीत करीत आहे हा एक मोठा गंभीर प्रश्न समोर आ-वासून उभा आहे. 


   शाळेत छोटे असतांना आपण सहजच प्रभात फेरी काढून भाषण देऊन मिरवत होतो परंतू मोठे झाल्यावर त्याच मुलांना, पालकांना त्याचा विसर पडतो आहे. आता मुलांना झेंडावंदनाची तितकीशी गोडी राहिली नाही. त्याचे कारण म्हणजे आजच्या पिढीला सर्व आयतं मिळाल आहे. जी वस्तू मोफत किंवा विणाकष्ट मिळते त्याची किंमत नसते आपल्या जुन्या पिढीने आपल्या जीवावर खेळून हे स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचा दोन शब्दाने प्रत्येक व्यक्तिने सन्मान करणे व स्वाभिमान ठेवणे, ही काही सांगावयाची गरज नाही ती मनातून स्फुरली पाहिजे.


 या सायन्सच्या जगात टेक्नोलॉजीची जेवढी शान आहे तेवढी इतिहासाची जाणिव दिसत नाही. देश पूर्णतया बदललेला आहे इथली लोके पूर्ण बदललेली आहे आपला परिवार आपले मित्र आपलं एज्युकेशन यापलीकडे त्यांना कोणत्याच गोष्टीत गोडी नाही इंटरेस्ट नाही.


 बघायला गेलो तर आपल्या भारत देशाच्या परंपरेचा इतिहास खुपच महान व दैदीप्यमान आहे. इथे सर्व जाती धर्म सांप्रदाय मोठ्या गुण्या गोविंदाने नांदत आहेत आणि तशीच चुनूक आपल्या भारत देशातील कर्तबगारांनी दाखविली आहे.हजारो कार्य पुर्णत्वास नेले आहेत. "हम भी कुछ कम नहीं" हे दाखवून दिले आहे. जर गुलामगिरीच्या विळख्यातून भारत स्वतंत्र झाला नसता तर परस्वाधीन होऊन मुक जनावरासारखे आपण खितपत पडलो असतो. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाला संपूर्ण जगात नामानिराळी ओळख मिळाली नसती. वेठबिगार होऊन गुलामी करून जी हुजूरी करतांना आपले आयुष्य घालवले असते.


 तसेच आताशी टेक्नोलॉजीने अतिशय वाखाणन्याजोगी प्रगती केली आहे. आधुनिक अस्त्र शस्त्र,चंद्रयान, लड़ाकू विमाने तरक्कीने महाशिखरे गाठले आहे. प्रचंड लोकसंख्या असुन सुद्धा रूखी सूखी खाऊन टक्कर देतो आहे.या सर्व गोष्टीचा अभिमान बाळगुन देशाचा कायापलट करण्यासाठी पूढे सरसावून भाईचारा राखून शांतता पाळून आपण आपल्या देशाची अस्मिता राखली आहे. आणि मोठ्या पातळीवर ऐतिहासिक कार्य करून पूर्ण जगत आपली चमक दाखविली आहे.


"आपला स्वातंत्र भारत असा असावा" की कोणी त्यावर तिरप्या नजरेने सुद्धा बघायला नको त्यासाठी सर्वाना मिळून मिसळून ऐक्य साधून कार्य करावे लागेल. हे सर्व

अबाधित ठेवण्यासाठी चांगल्या विचाराची देवानघेवान करावी लागेल बंधूभाव टिकवून सामंजस्याने वागावे लागेल. नाही काही करता आले तरी समाजात फुट पाडून भांडने लावू नये.आपल्या गावाला स्वच्छ, सुंदर, सुशोभित व साक्षर करून कायदा व सुव्यवस्था राखने महत्वाचे आहे. चांगले आचरण आणि नितीमत्ता ठेवून आपले व्यक्तीत्व तेजस्वी करायला पाहिजे. तेव्हाच आपण व आपला देश समृद्ध होऊ शकतोय.


  आजची गरज म्हणजे आपण पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाला आहारी जावून आपल्या देशाशी गद्दारी करितो आहे .नव पिढीने पाश्चात्यिकरणा पासून सावध रहाण्याची गरज आहे.आपण आपल्या गुणांचा educations चा वापर जर आपल्या देशासाठी केलात तर काही प्रमाणात भारतीय संस्कृतीला लागलेला हा शापित कलंक धुवून काढायलाही मदतच होईल. आणि स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून थोर पुरुषांच्या बलीदानाची परतफेड करू शकू. तेंव्हाच आपल्या देशाची अंतरराष्ट्रीय महत्ता परीनामकारक ठरून देशाची तरक्की होईल व अापण निर्धास्त होऊन आपले आयुष्य स्वाभिमानाने जगण्यास समर्थ होऊ.


Rate this content
Log in