"सर्वांना नमस्कार"
"सर्वांना नमस्कार"
सौरभ आणि शशी दोघांना शाळेत योगदिवसच्या दिवशी नमस्कारावर संबोधन करायचे होते तर त्यांनी आपसात ठरवले. अधी सौरभ बोलत होता, "रोज सकाळची सुरुवात सर्वात आधी देव-आराधना 'कराग्रे-वसते-लक्ष्मी-करमध्ये-सरस्वती-करमुले-तू-गोविदम्-प्रभाते-कर-दर्शनम्' हे श्लोक म्हणूनच करत जावे, असे आई सांगायची आणि त्याचबरोबर सूर्यनमस्कारपण केल्याने प्रकृती बळकट होते."
नंतर शशी बोलला, "माझे आजोबा रोज सकाळी हात जोडूनच देवांना नमस्कार करायचे आणि तीपण आपली संस्कृती आहे. कोणालाही आधी नमस्कार करतो आपण भेटल्यावर. योगाभ्यासाच्या हिशोबानेसुद्धा सांगतात, 'हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर किंचित दाबून जोडले जातात. ह्यामुळे सर्व बोटांचा मेंदूवर दाब पडून रक्तसंचार बरोबर होतो. शरीरात चैतन्य खेळते. मन प्रसन्न होऊन आनंदी वातावरणाची निर्मिती होते. दोन व्यक्तींमध्ये सकारात्मक भावना निर्माण होऊन स्नेहभाव वाढतो.' "नमस्कार सर्वांना".