राष्ट्र बलवान..!
राष्ट्र बलवान..!
एकदा भारतीय व्यक्तीच्या स्वप्नात, साद नावाची परी आली व अनमोल संदेश सांगून गेली. भारतीय नागरिकांनो,
आपल्या राष्ट्रातील जनता सुदृढ असेल तेव्हाच राष्ट्र बलवान बनेल.व महाशक्तीच्या रुपात राष्ट्र उभारेल.
म्हणून राष्ट्राच्या नागरिकांनो तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका.तंबाखूमध्ये असंख्य जीव घेणे रसायने असतात.त्यामुळे मृत्यूचा फास जवळ-जवळ सरकत असतो.दुर्धर आजाराच्या अंती आवळतो.प्राणाला मुकतो. संसार विखरतो. पुढील भावी पिढी परंपरागत नकळत वाईट व्यसनाच्या विळख्यात सापडते.असंच चालू द्यायचं का...? आपल्या मुलाबाळांचा सुखी संसार पहायचा असेल तर सोडा आताच स्वतः तंबाखू सेवन...! मुलाबाळांवर न खाण्याचे संस्कार करा. अन् वाचवा आपली भावी पिढी...!!वाचवा आपले राष्ट्र...!!! एवढे बोलून ती परी अदृश्य झाली.
बोध:- "खरं आहे. राष्ट्रातील जनता निरोगी असल्याशिवाय राष्ट्र बलवान होऊच शकत नाही. म्हणून व्यसनमुक्त होऊन जीवन जगणे, प्रत्येक व्यक्ती व राष्ट्र हिताचे आहे."