मनातली सुंदरता महत्वाची
मनातली सुंदरता महत्वाची
एका गावात गणपतीचे देवळातून मुलीच्या सुरेख स्वरात मधुर भजनांचा रोज पहाटे आवाज यायचा. शहरातून आलेले सुनील आणि प्रमोद संगीतकार आपसात बोलत होते,
"सकाळी-सकाळी उठल्यावर हे भजन जर कानांवर पडले की माणूस अगदी मनमुग्ध होतो". मग जातात ते भेटायला गुरूजींना. त्या मुलीशी भेटायची इच्छा प्रकट करायला.
ती भजन गात होती, आवाज सरस होता, तेवढ्यात ते येतात गुरूजींबरोबर, पाहून एकदम दोघे राह्यले दंग. आंधळी असून सावळी पण होती दिसायला ती.
मनात करूनी विचार "काय भुललासी वरलीया रंगा" गुरूजींनी सांगितले, लहानपणी देवाचरणी कोणी ठेऊन गेले, मी तिचा सांभाळ करून भक्तिभावाने संगीतात रमवले तिला, आणि नाव ठेवले सरस्वती. दोघांनाही कळाले मनातली सुंदरता महत्वाची, तिला गायनसाठी निवडले.