लव्ह मॅरेज
लव्ह मॅरेज
पूजा एक खुप छान मुलगी होती. ती तिच्या वर्गात सगळ्यात हुशार होती. ती तीच्या आजोळी राहायची . तीच्या आईबाबांपासून लांब राहत होती. ती पहिली पासून तीच्या आजी कडे राहतं. तीच्या आजोळी सगळेच तिचा खुप लाड करत.तीचे मामा तिच्या वर खूप खूप प्रेम करत.एवढं कि त्यांच्या मुलांपेकशा ती महत्वाची होती. ती खुप लाडात वाढली.
शाळेत ती खुप हुुुशार होती . पाहिला न. तिचाच होता.ती सगळ्याांशी प्रेमाने वागाायची . ती सगळयांना बोलत.मुली मुलं असं काही फरक करत नव्हती. ती खूप बिंदास होती. दर वेळी तिचा 1 नाही तर 2 नं. येत होता. तीच्या वर्गात एक मुुुुलगा होता. तो तिचा खास मित्र होता. ती तीच्याकडे वाहत जात होती. तीला त्याच्या सहवासात राहायला आवडतं होत. तोही तीच्या वर खूप खूप प्रेम करत होतां ते त्याच्या शाळेच शििक्षण पूूर्ण करून काॅलेज ला जाऊ लागले. दोघांनी एकाच काॅलेेज मधे प्रवेश घेतला होता. ते तििथेच भेटत होते. त्याना लग्न करायचं होतं .
पण अडचण एक होती. ती अशी की दोघांची जात वेगळी होती. त्या मुळे त्यांच्या लग्नाला कुणी परवाानगी देेनार नाही हेे त्यांना माहीत होत. त्यामुळे त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले. जेव्हा त्यांच्या घरी हे कळल तेव्हा सगळे खूप वैतागले पुजाला तीच्या मामानी खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तीने त्यांच ऐकलं नाही. सगळ्यांनी तीच्या सोबत नातं तोडले. तीच्याशी बोलने सोडून दिले. त्यांनी तीला खूप वाईट बोलत होते. ते म्हणाले की तू कधीच खूश राहणार नाही. ज्यासाठी तू आम्हाला सोडून गेली. एक दिवशी तोच तुला कायमचा सोडून जाईल. हे ऐकून तीला खुप दुःख झाले. ज्यांनी कायम तीच्या सुखाचा विचार केला .त्याच्या तोंडून अ सेे शब्द तीने स्वतःसाठी पहिल्यांदा ऐकले होते.
मागचा विचार सोडून तीने पुन्हा नव्याने सुरूवाात केली. ते दोघे आनंदात राहत होतेे. काही दिवसांनी पूजाला दिवस गेले. तीने हेे तीच्या माहेरी सांगीतले. हे ऐकून त्यांचा राग विरघळून गेला. सगळ्यांनी तीला स्वीकारलंं आनि तीला बोलवून घेतले. तिला एक छानशी मुलगी झाली ती सेम तीच्या बाबांवर गेली होती. तीच नाव खुशी ठेवलंं. तीच्या येन्याने सगळ काही नीट झाालं. सगळ्यांनी मिळून तीचा वाढदिवस खूप चांगला केला.
काही दिवसांनी पूजाचा नवरा आजारी पडला. त्याला कोरोना झाला आणि त्यातच त्याचा जीव गेेला. पूजा हे सहन करू शकत नव्हती. तीच्या घरच्यांनी तिला खूप साथ दिली. तीला आधार दिला. तीच्या मुलीला जीव लावला. तीच्या घरच्यांनी तिची साथ दिली नसती तर तीचं काय झालं असतं ठाऊक नाही. पण तिच्या घरच्यांना मात्र एका गोष्टीची खंत वाटते की त्यांनी तिला ओळखले नााही. तीच्यावर विश्वास ठेवला नाही आणि तीला नको ते अपशब्द बोलून तीला दुखवलं.
त्यांना असे वाटत होते की तीच्यावर जी वेेेळ आली ती त्यांच्यामुळच आली. कारणं त्यांनी तसा श्राप दिला होता आणि आगदी तसंच झालं. त्यामुळे कधीच आपल्या तोंडातून वाईट शब्द आणायचे नाही. कारण त्याच्या परिणामाने त्रास आपल्या माणसांना होतो.