घुसमट
घुसमट
आज वयाची पन्नाशी संपली. कोरोना महामारी रोज ग्रुपवर फक्त श्रद्धांजली. अगदी अपेक्षा नसलेल्या व्यक्तिंची बती गुल झाल्यावर वाटते. आपण स्वतः निरोप घ्यावा. समाजाला वाटते अगदी घरातील लोकांना वाटते देवा आता यांना उचल'. प्रवास संपव पण नाही नियतीचा खेळ ना कुणाला कळाला वा टळला. कोरोना महामारीमध्ये माणसाच्या मर्यादा ' .औकात विसरलेल्या माणसाला जणु एक चपराक दिली कि जागा हो. निसर्ग नियमाने वाग . त्यावर कुरघोडी करू नको वा मात केली म्हटलास तरी देखिल वेळेपूर्वी माती झाल्याशिवाय रहाणार नाही . अरे जन्मापासून त्याच क्षणी ओरडतो तो शेवटपर्यतं रडतोय : धाव धाव धावतो शेवटच्या क्षणी तुझी धाव कधी संपते ती तुलाही कळत नाही कारण कळणारा देहातून तू कधीच धाव घेतलेली असते . रहाते फक्त ती बॉडी . शेव ते ना तुझे ना तुझ्या जवळच्यांचे त्याची राख किंवा माती काही क्षणात करावीच लागते . तेंव्हा जाणिव होते मी का१ ?व कणा साठि धावत व जगत होतो कारण मी स्वतः जगलोच नव्हतो बालपण इतंरांचे स्वप्न. वंशाला संसाराला फुललेले (मुल) फुल म्हणून वाढलो उमलत गेलो कळीच फुल झालो . सुगंधाचा उपयोग कुणासाठी होता रंगरूप आकर्षण कुणाला होते.
जेंव्हा झाडापासून फूल अलग झाले झाडाचे अस्तितव माझी किंमत मला यथ् खुप वाटत होती . माझा गंध (गर्व) वास सहवास झाडाच्या छायेत असलेली ताजगी (परावलंबी) खुप छान वाटायची . माझा टवटवीतपणा( तारूण्य ) मळमुळे , सुगंध मुळे माझी मागणी व देवाच्या पुजेसाठि
(समाजासाठी. इतरांसाठी) असणारी किंमत यामुळे माझ्या प्रती स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीमधील फरक गणितात कळतो मला मात्र द देवा ची पूजा व काही कालावधी (आयुष्य) गेल्या वर कळाले तारुण्यात असलेली रग ' माज '. गर्वाची रग स्वतःच्या बुद्धिमतेवर व कर्तव्यावर असलेली पकड व स्वार्थ च्या विश्वात पूर्ण बुडालेला स्वतःचा स्वर्ग . स्वतःचे नियम व मीपणाचा आलेला गंज वाढु लागला कि रंगरूप जसे बदलते व अगदी मजबुत पोलादी कांब आतू कशी कमकुवत होते तरिही गजाला असलेला पिळ कायम असतो मात्र जेंव्हा भार सोसतना पोलादी कांब केवळ लागलेल्या गंजमूळे अचानक भाराने वाकू लागते व हळुहळु मान टाकते तशी तारूण्याची रग व मस्ती उतरल्यावर पिळदार शरिर व तारूण्याची रग उतरल्यावर उतारवयात काठीचा आधाराशिवाय चालता येत नाही. नंतर काठी ही पकडता येत नाही. लागतो फक्त तो इतरांचा आधार (वार्धक्य) शरीरावर पडलेल्या सुरकुत्या. लटलटणारे हातपाय व उडालेला रंग काळेभोर केस पांढरे शुभ्र व आकार२ाहित ना स्वतःसावरू शकत वा ना कुणी सावरणारे जवळ असुनही सावरून काय उपयोग म्हणुन आहेती पूर्ण उडण्याची वाट पाहत होती.
हे पिकलेले शरिर (देवापुढे वाहिलेले सुगंधी ताजे फुल दुसऱ्या दिवशी उजलून कचऱ्यात फेकले जाते ते केवळ खत (माती) होण्यासाठी तशी या शरीराची अवस्था झाली तेव्हां कळाले काय किंमत होती माझी त्या देवाला वा अर्पण करणाऱ्या म्हणजे माझे सगेसोयरे .आप्त . बायको ' मुले सारा माया जाळ प्रत्यक्ष सरणावर माझे शरिर जळतांना मला कळाली तेंव्हा माझे मन मोकळे झाले . व म्हणाले माझी तुझ्या शरिरात आंतरमन बाह्यमन अशी या
क्षणा पर्यत सतत घुसमट होत होती ..
