Sanjay Raghunath Sonawane

Horror

3.3  

Sanjay Raghunath Sonawane

Horror

भूत-भय कथा

भूत-भय कथा

3 mins
6.1K


पूर्वी मला तमाशा पहाण्याचा खूप नाद होता. पूर्वीचे तमाशे रात्री चार चार वाजेपर्यंत कार्यक्रम करायचे. तमाशा पहाण्यासाठी लोक गाडीबैल करून बायका पोरांसह येत होते. पाच, सहा गावचे लोक तमाशा पहायला यायचे.

मी मात्र पायी, पायी जायचो, यायचो. त्यात आमच्या गावात अफवा पसरली होती की गावाच्या शिवाजवळ भूत निघतेय. माणसा बरोबर कुस्ती खेळते .ते एकटे माणूस दिसले की विडी मागते.कधी बाई बनते तर कधी पुरुष बनते. ते आपल्याकडे येताना उलटे हात पाय, लांबलचक केस मोठ, मोठे दात असे आक्राळ विक्राळ दिसते.कधी गाड्याना हात करून सुंदर स्त्री बनून गाडी बाहेर ओढते व ठार मारते.तसेच सायकल व मोटरसायकल वर माणूस दिसला तर त्याला ते दिसते;पण हात लावत नाही. मात्र गाडी थांबविण्यासाठी अनेक रुपात अडवते.कधी, कधी ते म्हाताऱ्या माणसाचे रूप धारण करून विडी मागते. आपल्याजवळ मटण नसावे. ते जर असले तर माणसाला जीवे मारते असी समजूत होती.

असेच मी एकदा तमाशा पहायला गेलो,. मनात भूत व भूताची जागा माहिती होती. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. साडे तीन वाजता तमाशा संपला. आकाशात चंद्र प्रकाश होता.तमाशा संपल्यावर मी त्या वाटेने जाऊ लागलो होतो. जसजसे जवळ ,जवळ येत होतो तसतसे भूत आपल्याला मारणार ही भीती निर्माण झाली होती. मी माझ्याच सावलीला भूत म्हणून समजू लागलो होतो.त्यात आमावस्येच्या रात्री भूते नाचत असतात. त्यांच्या झुळकीत सापडले तर भूत ठार मारते. पूर्वी गावतल्या एका माणसाला भूताने ठार मारले होते असा समज होता.त्या ठिकाणी एका तरुणाला लग्नाच्या अगोदर कोणीतरी खून करून मारले होते त्याचा बदला घेण्यासाठी ते भूताच्या जन्मात गेले होते.त्यामुळे ते दरवर्षी एकाला मारते असा गावकऱ्यांचा समज होता. भुतापासून वाचण्याचे मार्गही गावकऱ्याना माहीत होते.

पण भूताला पळवायचे म्हणजे खिशात आगकाडी पेटी ठेवायची असे एकाने सांगितले होते. म्हसोबाला भूत घाबरते म्हणून मी जय म्हसोबा असा मोठ्याने ओरडायचो . आगपेटीच्या आधाराने मी झपाझप चालत होतो. माझीच सावली मला भूत वाटायची.चंद्र मी चालेल तसा माझ्या सोबत चालतोय असा भास व्हायचा. गावात एकाने तर असे सांगितले होते की भूत लघवी शिंपडल्यावर अंगाला स्पर्श करत नाही. ते आठवल्यावर मला तो एक जालिम उपाय सापडला. तसा मी भीतीने घाबरलोच होतो. त्याच वेळी जोराची मला लघवीपण आली होती. ती लघवी आजुबाजुला शिंपडली. थोडीफार हातापायाला लावली. त्याच्या आधाराने मला हिम्मत वाढली. भीतीमुळे न मागे जाता येईना ना कुणाची वाट पाहता येईना.त्यामुळे माझी मनातली भीती कमी झाली होती.मी आगकाडी पेटवायचो व चालायचो. असे गाव जवळ येईपर्यंत चालू होते. सर्व आगकाड्या संपल्या.आगपेटी फार मोठा आधार होता. आधाराने घर गाठले. खऱ्या भूता पेक्षा मनातल्या भूतानीं कहर केला होता.भूताला घालवण्या साठी मांत्रिक होता. तो ते भूत घालविण्यासाठी बकरा, कोंबडीचा बळी द्यायचा.पूर्वी हातमजुरीने काम करणारा असला आणि तो आजारी पडला की तो आमवस्याच्या रात्री कुठे गेला नव्हता ना?असा घरच्याना प्रश्न पडायचा. मग जर तो गेला असे समजले तर त्याला मांत्रिकच बरा करत होता. त्याकाळात डॉक्टर गावापासून लांब असायचे. लोकांचा विश्वास मांत्रिकावर जास्त असायचा. त्यात मांत्रिकाच्या मंत्राने गुण न येता माणूस दगावला तर भूतानेच मारला असे समजले जायचे. भूत मांत्रिकाच्या वरचढ झाल्याने मांत्रिकाच्या मंत्राने भूत आवरले नाही असे मानले जात होते. पूर्वी दळणावळणाच्या सोई फार कमी होत्या.काही गावात वीज नसायची. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अंधार असायचा. अंधारात भूत रहायचे. पण अंधार जाऊन वीज आली तसे भूत गायब लागले होते. गावच्या लोकांना अश्या गोष्टी टाईमपासचे साधन बनले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror