Anuja Dhariya-Sheth

Horror

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Horror

अन् ती मुक्त झाली ..

अन् ती मुक्त झाली ..

6 mins
293


अरे सुशांत, मी माधव बोलतोय...

हा बोल माधव.. काय कशी काय आठवण काढलीस?

अरे तूझा गडी आहे ना गणपत.. तो काम सोडायच म्हणतोय.. माझ्याकडे आला होता... साहेबांशी बोला म्हणाला..

अरे, पण अचानक काय झाले? विचार त्यांना.. पगारवाढ हवे का?... सुशांत म्हणाला..

थांब इथेच आहेत देतो त्यांना.. माधव

गणपत काकांनी घाबरत फोन हातांत घेतला, साहेब तुम्ही ईश्वास  ठेवणार नाय.. आपल्या शेतात हाडळ आहे.. अजून बाहेर कोणाला बोललो नाय म्या.. माधवरावांना सांगून तुम्हाला फोन केला.. काय तो बंदोबस्त करा... गणपत काका घाबरत बोलले..

अहो काका असे काय नसते हो.. ह्या सर्व अंधश्रद्धा असतात हो.. सुशांत

नाय नाय साहेब.. मला नाय जमणार.. म्या काम नाय करणार.. म्या तिथ राहणार नाय... गणपत

तुम्ही माधवला फोन द्या.. सुशांत म्हणाला

माधव, मी ह्या वेळेस आठ दिवसाची सुट्टी काढले, येतोय मी आता.. दोन- तिन दिवस जरा तू बघशील का? .. सुशांत


हो, अरे बघतो मी... माधव म्हणाला

सुशांत ईनामदार एक बडे व्यक्तीमत्व... गावात खूप मोठी जागा, शेती- वाडी सर्व काही गणपत बघत होता.. त्याचा मुलगा पण आता तेच काम करत होता.. पण भाऊसाहेब ईनामदार गेले आणि वाड्यावर काही बाही हालचाली होऊ लागल्या... कामला कोणी येईना.. गणपत खूप पण आज सहा महीने प्रयत्न करून तो हतबल झाला.. शेवटी आज त्याने मालकांना फोन केला..


माधवने धीर देऊन त्याला पाठवल, अन् म्हणाला.. मालक येतील आता.. तोवर इथे येऊन रहा, भीती वाट्त असेल तर... गणपत भीत भीत निघून गेला...

दोन दिवसांनी सुशांत त्याच्या कुटुंबाला घेऊन आला, वाड्यावर राहायची इच्छा त्याने दाखवली... मालकाला एकट कस राहू द्यायचं, हाडळ आहे ना तिथे असा विचार मनात येताच गणपत पण परत वाड्यावर गेला...

मालकाचा ईश्वास नाय.. कस पटवून द्यायच?

या विचारात असताना मालकीण बाई म्हणजेच सुशांतची बायको सायली मळ्यात फेरफटका मारुन यायच म्हणाली.. ह्याना कस आडवू? जाऊ नका म्हणून तोपर्यंत तें मळ्याच्या दिशेने चालू लागले.. गणपतच्या मनात भीती त्यामुळे त्याला सारखा भास होत होता ती हडळ दिसत होती... बाई साहेब ह्या वक्ताला तिकड जाऊ नका जी.. सांजची कीरकीरती येळ हाय.. कसला फेरा व्हायचा..

सायली म्हणाली, अहो काका काय बोलताय हे..

अहो व्हय बाई साहेब.. छोट्या मालकास्नी नका नेऊ तिकड चला बिगी बिगी...


सायलीने सुशांतला घरी आल्या आल्या गणपत काका काय बोलले तें सांगितलं... सुशांत म्हणाला, सायली तू सुद्धा... मानतेस हे सर्व...

बर मला शांत विचार करू दे मी काय तें बघतो...

रात्री विहीरीच्या इथून आवाज येतं होते, गणपत मालक मालक ओरडत आला.. त्याच्या मुलाला गोविंदाला कोणीतरी उचलून आणले, बेशूद्ध झालेला तो...

मालक तुम्ही चला, आपून इथून जाऊ.. लय भयानक गोष्टी घडतायत... त्या दिवशी रक्मा पाणी काढायला ईहरीवर गेली तर त्या पाण्याचा रंग बदलला.. जनू काय रगात... कोनाच्या जीवाचा घातपात व्हायच्या आधी चला तुमि.. माज ऐका.. मालक..

सुशांतने त्याला धीर दिला... म्हणाला, काका मला दोन दिवस द्या फ़क्त.. तुम्ही घरी जाताय का तुमच्या? इथे भीती वाट्त असेल तर घरी जा...

नाय मालक असा नका बोलू... तुका सोडून म्या नाय जानार...

सुशांतने माधवशी बोलुन एक निर्णय घेतला.. फक्त कोणाला सांगायचं नाही हे ठरलं..

गणपत काका, सायली आणि गणपत काकांचा परिवार यांच्या मनाची शांती म्हणून भटजींना बोलावलं.. शांती करून घेतली. आता काय धोका नाय मालक.. गणपतने हात जोडले.


मालक लय उपकार झाले बगा.. तुमि शिकले हायसा. तुंम्हाला अशा गोष्टी पटत्याल कि नाय असा वाटत होता.. पर तुमि माझ्या येड्याच ऐकलत, बर वाटलं.. मोठ्या मालकावानी तुमि पर चांगल हायसा... आमच्या सारख्या गरीबाला पर आपल मानता, जीव लावता...

गणपत काकांच्या मनातली भीती कमी झाली होती. पण अजूनही चित्र-विचित्र प्रकार घडत होते.. सुशांतने केलेली आयडिया फ़क्त माधवला माहित होते.. त्यांना गावात येऊन ५ दिवस व्हायला आले.. अजून काही कळंत नव्हते.. त्या किंकाळ्या.. विहीरीचे लाल पाणी, रात्री होणारे आवाज. सायली खूप घाबरली होती.. मळ्यात काही झाल्याच गणपत काका बोलत नव्हते.. म्हणजे आता वाडा धरलाय त्या हडळीने मालक... हे कायतरी वेगळाच प्रकार हाय बघा..

सुशांतला पण काही कळत नव्हतं.. नक्की काय प्रकार आहे काहीच कळंत नव्हत.

सुशांतला ह्या गोष्टी काही पटत नव्हत्या.. माधवला हाताशी घेऊन त्याने त्या आवारात CCTV कॅमेरा बसवले, जेणेकरून जर मुद्दाम कोणी काही करत असेल तर त्या कॅमेर्यामुळे ती व्यक्ती पकडली जाईल..

पण काही गोष्टी या सुशांतच्या नकळत घडल्या होत्या, तो शिक्षणासाठी बाहेर होता त्यामुळे मधल्या काही वर्षात काय घडलं ते त्याला माहीती नव्हते..

त्याचा मोठा भाऊ सुशील याला याचा अपघात झाला आणि त्यात तो जागीच गेला. खर तर तो अपघात एक गुढ होते सर्वांसाठीच...

सुशीलदादाला काडीचे सुद्धा व्यसन नव्हते, आणि जास्त प्यायल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटला असे त्याच्या मॄत्युनंतर समजले.. तो त्याच्या मित्राकडे पार्टीत गेला होता, आणि येतां येतां ही घटना घडली.

भाऊसाहेब या धक्क्याने खचले, आईसाहेब यांनी तर सुशील गेल्यावर महिन्यातच आपले प्राण सोडले.. एका मागून एक अशा घडलेल्या याघटनेमुळे सुशांत गावी आला तो तिथेच राहिला..

सायली सोबत लग्न झाले, अन् त्यांची शहरात असलेली  जागा डेव्हलप करून तिथे त्यांना त्यांच्या मळ्यात येणारी फळे, भाज्या तसेच औषधी वनस्पती यांच्या व्यापार वाढवायचा होता.. तें शहरात स्थायिक झाले, इकडे बाई माणूस नाही, तुमची आई तिकडे जवळ आहे. त्यामुळे तुम्ही तिकडेच रहा सूनबाई असे भाऊ म्हणायचे.. सुशा़ंतने सुद्धा हे बोलणे कधी मनावर घेतले नाही.. तो म्हणायचा भाऊंना खूप काळजी आहे सायलीची.

पण आज इथे बऱ्याच गोष्टी अशा घडत होत्या की त्याने प्रत्येक गोष्टीचे मुळ शोधून काढायच ठरवलं.. लग्नं झाल्यावर गाव देवीची ओटी भरायला सायली आली त्या नंतर भाऊंनी तिला येउच दिले नाही. भाऊ जायच्या आधी आजारी पडले, म्हणून मी आलो. तेव्हा सुद्धा माझे काही बरे वाईट झाले तरी सूनबाईंना बोलवू नको.. एवढूस पोर त्यात त्या सुद्धा ओली बाळंतीण...

सुशांतचे डोकं सुंन्न पडत चालले होते.. भाऊ नाहीत, हे असे प्रकार घडतायत.. कोणाला विचारू?

सायलीला सतत भास होत होते.. कोणतरी आहे आजू बाजूला आहे, कधी तिच्या डोक्यावरून कोणी हात फिरवत आहे असे वाटायचं..

त्यात भाऊंचे धाकटे बंधू अण्णा अगदी उलट स्वभावाचे.. गुंडगीरी करून दारू पिऊन तमाशा करणारे. एकदा अण्णांनी गावात रहात असलेल्या सखारामाचा खून केला.. काही तरी व्यवहारावरून झाले होते.. त्या नंतर स्वतःच्या धाकट्या भावाच्या विरोधात भाऊंनी साक्ष दिली आणि अण्णांना शिक्षा झाली.. पुढच काहीच त्याला आठवत नव्हत..

हे सर्व झाले तेव्हा ५ वर्षाचा होता आणि सुशील दादा १० वर्षाचा...

माधव घरी आला, अरे हे बघ CCTV चे काही फुटेज.. मला तुझ्या अण्णा काकांचा संशय आहे.

सुशांत म्हणाला, काय? त्यांची सुटका झाली का?

हो... आताच काही महीने झाले..

माधव मला वेड लागेल आता.. काय चाललंय हे काहीच कळत नाही.. आपण कॅमेरा लावल्याचे मी कोणालाच बोललो नाही.. पण आता या वाड्यात काहीतरी विचित्र घडतय..

सायली कोणाशी तरी बोलते, विचारले तर म्हणते मी कुठे बोलत होते.. मला काहीच कळंत नाही माधव..

माधव सुशांतला धीर देतो.. गणपत काका खूप जुने आहेत तेच काय तें सांगू शकतील..




गणपत काका मला काहीच माहीती नाही अण्णा काका बाबतीत... तेव्हा मी खूप लहान होतो. भाऊ गेले, दादाचे असे झाले.. आता हा प्रकार.. सायली अशी वागते? माझा विश्र्वास नाही.. तुम्ही बोलता तसे सावलींचे खेळ चालत असतीलही..


हल्ली कॅमेरे निघाले आहेत.. मळ्यात, वाड्याच्या अवती-भोवती मी लावले होते.. त्यात काही हालचाली दिसल्या.. आता जर हे सर्व तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे अमानवी शक्ती घडून आणत असेल तर तें कॅमेरामध्ये कसे दिसेल.. आणि जर कॊणी खरी व्यक्ती घडवून आणत असेल तर कशा साठी? माधव तू म्हणालास की ह्या सर्व गोष्टीं मागे अण्णा काकांचा हात आहे. हे जरी खर मानायचे ठरवलं तरी तें का करतील असे? आणि मग् सायली कोणाशी बोलते? तिलाही कळंत नाही पण ती कोणाशी ना कोणाशी बोलत असते..


गणपत काका म्हणाले, मालक माझा शक खरा ठरला.. अण्णा मालक यांनीं ज्या सखाराम पाटीलचा खून केला त्याची बायको साविञी आणि त्यांची मुलगी म्हणजे आपली मालकीण...


काय बोलताय तुम्ही हे काका?... सुशांतने विचारले.


म्या खर तेच बोलतोय मालक.. थांबा तुमाला सर्व खर सांगतो मी...


अण्णा मालक आणि मोठे मालक सावत्र भाऊ... अगदी उलट स्वभाव.. आपले मोठे मालक खूप चांगले, देवमाणूस बघा.. त्यांनी कधीच अण्णा मालकांना सावत्र वागणूक दिली नाय. पण अण्णा मालक कायम सावत्रपणा दाखवायचे, मालकांना खूप त्रास द्यायचे.


व्यवहारावरून काय झालं आणि त्यांनी सखारामचा खून केला, सावित्रीने मोठ्या मालकांना येऊन सर्व सांगितले.. मोठ्या मालकांनी सावित्रीबायला वचन दिले तू जी असल ती खरी साक्ष दे.. मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे.. अण्णा मालकांना हे समजल्यावर तिच्या अब्रूवर हात टाकायचा प्रयत्न केला त्यांनी.. झटापटी करून सावित्री धावत धावत वाड्यावर अाली.. कडेवर हे लेकरू म्हणजेच आपल्या सायली ताई.. ती आली तेव्हा तिच कपडं फाटलेल व्हतं..


मालकांना अण्णा मालकांचा लय राग आला, त्यावेळी पहिल्यांदा मालकांनी अण्णावर हात उचलला.. अण्णा लालेलाल झाल.. त्यांनी अण्णांसमोर सावित्रीला धमकी दिली.. बघून घेईन म्या..


त्या रातच्याला काय झालं तें काळाच्या पोटातलं गुपित हाय बगा.. कोणालाच माहित नाय.. ही चिमुरडी पोर वाड्यातल्या अंगणात ठेवून सावित्रीने ईहरित उडी घेतली..


त्यावेळी मोठ्या मालकांचे मित्र म्हणजेच तुमचे सासरे, बर्वे वकील त्यांच्या बायको सोबत आले होते.. आपल्या गावदेवीला नवस बोलायला.. त्यांना पोर हुत नव्हंत म्हणून.. झाला सर्व प्रकार त्यांनी पाहिला. वकीलीण बाईंनी आपल्या मालकांना विश्वासात घेऊन सायली ताईंना घेऊन शहरात गेल्या.. एका अनाथ मुलीला आई-बाप मिळालं.. म्हणुन मालक तुम्हाला नेहमीं म्हणायचं मालकीणबाईंना इथे आणू नका..


हा सर्व प्रकार ऐकल्यावर सूशांत स्तब्ध झाला.. त्याची विचार करण्याची क्षमताच बंद झाली होती..


माधवने त्याला धीर दिला.. आपण काहीतरी नक्की मार्ग काढू. तोपर्यंत तू शांत रहा.


सायलीच्या आई- बाबांना बोलवून घेऊ का?.. सुशांत


मालक नको.. आधी ती हडळ दिसते ती सावित्री आहे का अजून कोण तें समजू दे.. तिच्या मनात जर वकील साहेबांचा राग असेल तर अजून लाश पडतील...


माधवने सुशांतचा हात हातांत घेऊन म्हणाला.. माझ्या ओळखीच एक वास्तू तज्ञ आहेत.. भोंदुबूवा नाहीत.. प्रत्येक गोष्टीत ‌विज्ञानाची सांगड घालून पटवून देतात..

तुला पटणार असेल तर आपण त्यांची भेट घेऊ.. आधी वहीनी सूरक्षित आहे का नाही कळु दे.. मळ्यात जे घडतय तें महत्वाचं नाही.


गणपत काका कॅमेरे लावलेत हे आपल्यातच राहून दे.


व्हय मालक तुमि नका काळजी करू..


वाड्यावर येतात, तेव्हा सुशील दादाची केस बाबत काही संशय वाटतोय म्हणून तुम्ही केस रीओपन करताय का? अशी चौकशी करायला पोलिस आले होते. सुशांत त्यांना म्हणाला, अहो नाही मी अस का करेन?


मी. ईनामदार मला तसा फोन आला होता. खर तर फोनवर मी बोललो तें पण भाऊ साहेब आणि माझे संबंध चांगले होते म्हणून.. आणि आता तुम्ही नाही म्हणताय.. मग् मला फोन करणार कोण? मॅडम म्हणाल्या तुमच्या सांगण्यावरून फोन केला.


अहो, पण मी तर अस कोणालाच सांगितल नाही.. सुशांत म्हणाला.. तेवढ्यात सायली आली, घरच्या सूनेला शोभेल असे पाहूणचार केला.. सुशांतने ओळख करून द्यायला पुढाकार घेतला तर इंन्स्पेक्टर साहेब स्वतःच म्हणाले, अहो या सायली मॅडम ना यांनींच तर मला फोन केला होता.. सायली किंचाळलीच.. अहो कस शक्य आहे हे..


सुशांतला एकावर एक शॉक बसत होते, डोकं काही काम करत नव्हते त्यात एक एक भयानक घटना..


इंन्स्पेक्टर साहेब म्हणाले, असू द्या अहो कोणी तरी मुद्दामून केले असेल.. आम्ही शोध घेतो.. चला येतो आता..


माधवला सांगून लवकरात लवकर त्या वास्तूतज्ञांना बोलावलं होते.. त्यांच्या मध्ये खूप ताकद होती.. वास्तूतज्ञ आले, त्यांनी पूर्ण पाहणी केली. सायली मात्र लांब पळत होती.. शेवटी त्यांनी तिच्या डोळ्यात डोळे घातले, हात हातांत घेऊन तिला समोर बसवले, तशी सावित्री समोर आली..


सायलीच्या रूपाने बोलू लागली. गणपत काकांना नमस्कार केला. भाऊसाहेबांच्या फोटोला नमस्कार केला.. आणि तिची सर्व कर्मकहाणी सांगितली.. अण्णांनी शेवटी तिच्यावर कसा हल्ला केला.. अब्रू वाचवली मी पण त्याने माझा जीव घेतला.. ह्या पोरीला अंगणात सोडून भाऊंवर आरोप करणार होता.. पण त्या आधीच मी विहीरीत उडी मारली.. मी त्या नराधमाशी झूंज दिली शेवट पर्यंत.. मग् मात्र हरले..


वकीलसाहेब होते, त्यांनी रातोरात निर्णय घेतला अन माझ्या पोरीला चांगल आयुष्य मिळाल.. कल्याण झाल तीचं..


पण माझा आत्मा काही शांत होत नव्हता.. तो असाच भरकटत होता.. कारण त्या अण्णाला फाशी नाही झाली.. कैद झाली फ़क्त.. सूशीलदादा त्या दिवशी येताना अण्णांच्या माणसांनी त्यांच्या सांगण्यावरून दारू तोंडात ओतली त्यांच्या अन् खून केला त्यांचा.. मी अण्णाच्या मागे फिरत होते.. त्याचा बळी घेतल्याशिवाय हा आत्मा शांत होणार नाही.


अण्णा जेल मधून सुटला, तरी लपून होता.. सुशील दादाला त्यानेच मारले.. वहिनींना हा धक्का सहन झाला नाही त्या गेल्या.. माझी लेक ह्या घरची सून झाली.. तिला बघायला म्हणून लग्न झाल्यावर लांबून आले.. माझी जाणीव, माझे अस्तित्व भाऊंना जाणवले, त्यांना वाटलं मी काय करेन, म्हणून त्यांनी लांब ठेवले तिला.. अन आज माझी लेक आई झाली, माझी माया ऊफाळून आली.. डोळे भरून बघितली तिला आता नाय परत तिला त्रास देणार.. मळ्यात मुद्दामून त्या अण्णांनी अन् त्याच्या माणसांनी उच्छाद मांडलाय.. हि इस्टेट त्याला हवे.. भुताटकी उठवली कि सगळी माणसे ही जागा सोडून पळुन जातील.. पण मी त्याची इच्छा कधीच पूर्ण होऊन देणार नाही..


सुशांतला काय बोलाव? काय निर्णय घ्यावा काही कळंत नव्हतं.. त्यांनी कॅमेर्याचे फुटेज पोलिसांना दिले तरी अण्णा पर्यंत हात पोहचत नव्हता..


त्या वास्तुतज्ञांना तिने वचन दिले, परत सायलीला त्रास देणार नाही, वाड्यात येणार नाही.


सुशांतला भेटायला अण्णा वाड्यावर आले, सुशांत लहान असताना तें तुरूंगात गेल्यामुळे सुशांतने त्यांना पटकन ओळखल नाही.. अण्णांनी ओळख सांगितल्यावर त्याने आदराने स्वागत केले.. वयाने मोठे म्हणून सुशांत व्यवस्थित वागत होता...


अण्णांनी सुशांतला सांगितलं, आता या वाड्यात लय विपरीत गोष्टी घडत आहेत.. मी तुम्हाला याची वाटणीचे पैसे देतो.. तुम्ही शहरात सुखाने रहा.. सुशांत मान्य करत नाही म्हटल्यावर अरेरावी सुरू झाली.. साविञी सायलीच्या रुपाने आली.. अण्णाला धरून तीने विहरीजवळ नेले.. आता पर्यंत त्याने केलेला पापाचा घडा त्याच्या तोंडाने कबूल करून घेतला.. आपल्या सायलीला काही झाले तर.. म्हणुन त्या काकांना सुशांतने बोलवून घेतले.. अण्णाला फरफटत विहीरीजवळ आणले, त्याला विहीरीत ढकलून दिल्यावर त्याच किकांळ्या... लाल रक्त बाहेर पडले..


सायली बेशूद्ध झाली.. काकांनी तिथे शांती केली.. सावित्रीने सूड घेतला.. काकांना दिलेल्या वचनातून ती मुक्त झाली..


सायलीला सुशांतने झाला सर्व प्रकार सांगितला.. तेव्हा सायलीला देखील खूप मोठा धक्का बसला..


त्या वाड्यातील सावल्यांचा खेळ मात्र आता संपला होता.. परत सर्व काही व्यवस्थित सुरू झाले होते.. समजून घेण्याच्या पलिकडे काही गोष्टी असतात हे सुशांतला आता समजून चुकले होते.


अजूनही समाजात अशा बऱ्याच अमानवी घटना घडत असतात, काहींचा विश्वास असतो तर काहींना अंधश्रद्धा वाट्ते.. पण अशा अमानवी गोष्टींचा काही अनुभव मी ही घेतला आहे..

कशी वाटली कथा? हि कथा पूर्ण काल्पनिक आहे. आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror