अन् ती मुक्त झाली ..२ अंतिम
अन् ती मुक्त झाली ..२ अंतिम
गणपत काका मला काहीच माहीती नाही अण्णा काका बाबतीत... तेव्हा मी खूप लहान होतो. भाऊ गेले, दादाचे असे झाले.. आता हा प्रकार.. सायली अशी वागते? माझा विश्र्वास नाही.. तुम्ही बोलता तसे सावलींचे खेळ चालत असतीलही..
हल्ली कॅमेरे निघाले आहेत.. मळ्यात, वाड्याच्या अवती-भोवती मी लावले होते.. त्यात काही हालचाली दिसल्या.. आता जर हे सर्व तुम्ही म्हणताय त्या प्रमाणे अमानवी शक्ती घडून आणत असेल तर तें कॅमेरामध्ये कसे दिसेल.. आणि जर कॊणी खरी व्यक्ती घडवून आणत असेल तर कशा साठी? माधव तू म्हणालास की ह्या सर्व गोष्टीं मागे अण्णा काकांचा हात आहे. हे जरी खर मानायचे ठरवलं तरी तें का करतील असे? आणि मग् सायली कोणाशी बोलते? तिलाही कळंत नाही पण ती कोणाशी ना कोणाशी बोलत असते..
गणपत काका म्हणाले, मालक माझा शक खरा ठरला.. अण्णा मालक यांनीं ज्या सखाराम पाटीलचा खून केला त्याची बायको साविञी आणि त्यांची मुलगी म्हणजे आपली मालकीण...
काय बोलताय तुम्ही हे काका?... सुशांतने विचारले.
म्या खर तेच बोलतोय मालक.. थांबा तुमाला सर्व खर सांगतो मी...
अण्णा मालक आणि मोठे मालक सावत्र भाऊ... अगदी उलट स्वभाव.. आपले मोठे मालक खूप चांगले, देवमाणूस बघा.. त्यांनी कधीच अण्णा मालकांना सावत्र वागणूक दिली नाय. पण अण्णा मालक कायम सावत्रपणा दाखवायचे, मालकांना खूप त्रास द्यायचे.
व्यवहारावरून काय झालं आणि त्यांनी सखारामचा खून केला, सावित्रीने मोठ्या मालकांना येऊन सर्व सांगितले.. मोठ्या मालकांनी सावित्रीबायला वचन दिले तू जी असल ती खरी साक्ष दे.. मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे.. अण्णा मालकांना हे समजल्यावर तिच्या अब्रूवर हात टाकायचा प्रयत्न केला त्यांनी.. झटापटी करून सावित्री धावत धावत वाड्यावर अाली.. कडेवर हे लेकरू म्हणजेच आपल्या सायली ताई.. ती आली तेव्हा तिच कपडं फाटलेल व्हतं..
मालकांना अण्णा मालकांचा लय राग आला, त्यावेळी पहिल्यांदा मालकांनी अण्णावर हात उचलला.. अण्णा लालेलाल झाल.. त्यांनी अण्णांसमोर सावित्रीला धमकी दिली.. बघून घेईन म्या..
त्या रातच्याला काय झालं तें काळाच्या पोटातलं गुपित हाय बगा.. कोणालाच माहित नाय.. ही चिमुरडी पोर वाड्यातल्या अंगणात ठेवून सावित्रीने ईहरित उडी घेतली..
त्यावेळी मोठ्या मालकांचे मित्र म्हणजेच तुमचे सासरे, बर्वे वकील त्यांच्या बायको सोबत आले होते.. आपल्या गावदेवीला नवस बोलायला.. त्यांना पोर हुत नव्हंत म्हणून.. झाला सर्व प्रकार त्यांनी पाहिला. वकीलीण बाईंनी आपल्या मालकांना विश्वासात घेऊन सायली ताईंना घेऊन शहरात गेल्या.. एका अनाथ मुलीला आई-बाप मिळालं.. म्हणुन मालक तुम्हाला नेहमीं म्हणायचं मालकीणबाईंना इथे आणू नका..
हा सर्व प्रकार ऐकल्यावर सूशांत स्तब्ध झाला.. त्याची विचार करण्याची क्षमताच बंद झाली होती..
माधवने त्याला धीर दिला.. आपण काहीतरी नक्की मार्ग काढू. तोपर्यंत तू शांत रहा.
सायलीच्या आई- बाबांना बोलवून घेऊ का?.. सुशांत
मालक नको.. आधी ती हडळ दिसते ती सावित्री आहे का अजून कोण तें समजू दे.. तिच्या मनात जर वकील साहेबांचा राग असेल तर अजून लाश पडतील...
माधवने सुशांतचा हात हातांत घेऊन म्हणाला.. माझ्या ओळखीच एक वास्तू तज्ञ आहेत.. भोंदुबूवा नाहीत.. प्रत्येक गोष्टीत विज्ञानाची सांगड घालून पटवून देतात..
तुला पटणार असेल तर आपण त्यांची भेट घेऊ.. आधी वहीनी सूरक्षित आहे का नाही कळु दे.. मळ्यात जे घडतय तें महत्वाचं नाही.
गणपत काका कॅमेरे लावलेत हे आपल्यातच राहून दे.
व्हय मालक तुमि नका काळजी करू..
वाड्यावर येतात, तेव्हा सुशील दादाची केस बाबत काही संशय वाटतोय म्हणून तुम्ही केस रीओपन करताय का? अशी चौकशी करायला पोलिस आले होते. सुशांत त्यांना म्हणाला, अहो नाही मी अस का करेन?
मी. ईनामदार मला तसा फोन आला होता. खर तर फोनवर मी बोललो तें पण भाऊ साहेब आणि माझे संबंध चांगले होते म्हणून.. आणि आता तुम्ही नाही म्हणताय.. मग् मला फोन करणार कोण? मॅडम म्हणाल्या तुमच्या सांगण्यावरून फोन केला.
अहो, पण मी तर अस कोणालाच सांगितल नाही.. सुशांत म्हणाला.. तेवढ्यात सायली आली, घरच्या सूनेला शोभेल असे पाहूणचार केला.. सुशांतने ओळख करून द्यायला पुढाकार घेतला तर इंन्स्पेक्टर साहेब स्वतःच म्हणाले, अहो या सायली मॅडम ना यांनींच तर मला फोन केला होता.. सायली किंचाळलीच.. अहो कस शक्य आहे हे..
सुशांतला एकावर एक शॉक बसत होते, डोकं काही काम करत नव्हते त्यात एक एक भयानक घटना..
इंन्स्पेक्टर साहेब म्हणाले, असू द्या अहो कोणी तरी मुद्दामून केले असेल.. आम्ही शोध घेतो.. चला येतो आता..
माधवला सांगून लवकरात लवकर त्या वास्तूतज्ञांना बोलावलं होते.. त्यांच्या मध्ये खूप ताकद होती.. वास्तूतज्ञ आले, त्यांनी पूर्ण पाहणी केली. सायली मात्र लांब पळत होती.. शेवटी त्यांनी तिच्या डोळ्यात डोळे घातले, हात हातांत घेऊन तिला समोर बसवले, तशी सावित्री समोर आली..
सायलीच्या रूपाने बोलू लागली. गणपत काकांना नमस्कार केला. भाऊसाहेबांच्या फोटोला नमस्कार केला.. आणि तिची सर्व कर्मकहाणी सांगितली.. अण्णांनी शेवटी तिच्यावर कसा हल्ला केला.. अब्रू वाचवली मी पण त्याने माझा जीव घेतला.. ह्या पोरीला अंगणात सोडून भाऊंवर आरोप करणार होता.. पण त्या आधीच मी विहीरीत उडी मारली.. मी त्या नराधमाशी झूंज दिली शेवट पर्यंत.. मग् मात्र हरले..
वकीलसाहेब होते, त्यांनी रातोरात निर्णय घेतला अन माझ्या पोरीला चांगल आयुष्य मिळाल.. कल्याण झाल तीचं..
पण माझा आत्मा काही शांत होत नव्हता.. तो असाच भरकटत होता.. कारण त्या अण्णाला फाशी नाही झाली.. कैद झाली फ़क्त.. सूशीलदादा त्या दिवशी येताना अण्णांच्या माणसांनी त्यांच्या सांगण्यावरून दारू तोंडात ओतली त्यांच्या अन् खून केला त्यांचा.. मी अण्णाच्या मागे फिरत होते.. त्याचा बळी घेतल्याशिवाय हा आत्मा शांत होणार नाही.
अण्णा जेल मधून सुटला, तरी लपून होता.. सुशील दादाला त्यानेच मारले.. वहिनींना हा धक्का सहन झाला नाही त्या गेल्या.. माझी लेक ह्या घरची सून झाली.. तिला बघायला म्हणून लग्न झाल्यावर लांबून आले.. माझी जाणीव, माझे अस्तित्व भाऊंना जाणवले, त्यांना वाटलं मी काय करेन, म्हणून त्यांनी लांब ठेवले तिला.. अन आज माझी लेक आई झाली, माझी माया ऊफाळून आली.. डोळे भरून बघितली तिला आता नाय परत तिला त्रास देणार.. मळ्यात मुद्दामून त्या अण्णांनी अन् त्याच्या माणसांनी उच्छाद मांडलाय.. हि इस्टेट त्याला हवे.. भुताटकी उठवली कि सगळी माणसे ही जागा सोडून पळुन जातील.. पण मी त्याची इच्छा कधीच पूर्ण होऊन देणार नाही..
सुशांतला काय बोलाव? काय निर्णय घ्यावा काही कळंत नव्हतं.. त्यांनी कॅमेर्याचे फुटेज पोलिसांना दिले तरी अण्णा पर्यंत हात पोहचत नव्हता..
त्या वास्तुतज्ञांना तिने वचन दिले, परत सायलीला त्रास देणार नाही, वाड्यात येणार नाही.
सुशांतला भेटायला अण्णा वाड्यावर आले, सुशांत लहान असताना तें तुरूंगात गेल्यामुळे सुशांतने त्यांना पटकन ओळखल नाही.. अण्णांनी ओळख सांगितल्यावर त्याने आदराने स्वागत केले.. वयाने मोठे म्हणून सुशांत व्यवस्थित वागत होता...
अण्णांनी सुशांतला सांगितलं, आता या वाड्यात लय विपरीत गोष्टी घडत आहेत.. मी तुम्हाला याची वाटणीचे पैसे देतो.. तुम्ही शहरात सुखाने रहा.. सुशांत मान्य करत नाही म्हटल्यावर अरेरावी सुरू झाली.. साविञी सायलीच्या रुपाने आली.. अण्णाला धरून तीने विहरीजवळ नेले.. आता पर्यंत त्याने केलेला पापाचा घडा त्याच्या तोंडाने कबूल करून घेतला.. आपल्या सायलीला काही झाले तर.. म्हणुन त्या काकांना सुशांतने बोलवून घेतले.. अण्णाला फरफटत विहीरीजवळ आणले, त्याला विहीरीत ढकलून दिल्यावर त्याच किकांळ्या... लाल रक्त बाहेर पडले..
सायली बेशूद्ध झाली.. काकांनी तिथे शांती केली.. सावित्रीने सूड घेतला.. काकांना दिलेल्या वचनातून ती मुक्त झाली..
सायलीला सुशांतने झाला सर्व प्रकार सांगितला.. तेव्हा सायलीला देखील खूप मोठा धक्का बसला..
त्या वाड्यातील सावल्यांचा खेळ मात्र आता संपला होता.. परत सर्व काही व्यवस्थित सुरू झाले होते.. समजून घेण्याच्या पलिकडे काही गोष्टी असतात हे सुशांतला आता समजून चुकले होते.
अजूनही समाजात अशा बऱ्याच अमानवी घटना घडत असतात, काहींचा विश्वास असतो तर काहींना अंधश्रद्धा वाट्ते.. पण अशा अमानवी गोष्टींचा काही अनुभव मी ही घेतला आहे..
कशी वाटली कथा? हि कथा पूर्ण काल्पनिक आहे. आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

