तू
तू
कधी कुणाची
याद जेव्हा येते ।
मन का मज
परत साद देते ।
नेत्रात उठते आशा
ओठही गीत गाते ।
भिरभिर ती नजर
दूर किती जाते ।
टवकारून मग कान
सहज कानोसा घेते ।
सांगतो मीच मनाला
याद तुझीच येते ।
बांधलेल्या आठवणी
उचकी मज देते ।
अशांत विचार सारे
घेऊन तिथेच नेते ।
होतो निर्जीव मी असा
श्वासही संथ होते ।
सारून दूर मजला
मग हृदय गती घेते ।
फुलतो परत मोगरा
दरवळ दूर जाते ।
फिरून बघतो मागे
स्वप्न ते खोटे होते ।