विसर सारे
विसर सारे
जा विसर आता सारे
नकोच तू आसवे गाळू ।
रामाचे हे वचन नाही
तेही नकोस तू पाळू ।
ह्रदयही हे माझेच
सांग मी कशास जाळू ।
विचारांनी बधीर झाला
उघडा बोडखा हा टाळू ।
मोगरा ही सुकून गेला
कसा तो केसात माळू ।
अंतरात न उरले आता
सांग तुलाच का छळू ।