पत्र
पत्र
विहिरीनी पाठवलं धन्याला पत्र,
दादा थोडे पाणी सोड इकडं.
माझ्यात साठला आहे खूप सारा गाळ,
त्यामुळे गावकर्यांचे होतायंत हाल.
तू नव्हतास तेव्हा सगळं सासवड चालू होता,
तू आल्यावर मात्र गावच्या तोंडचं पाणी पळालं.
पाण्यासाठी लोक गाळात डुबून मरायला लागली,
पोरं बाळ गुरंढोरं तहानेनं मरायला लागली.
आता तरी तुझ्या मायेचा दरवाजा खोल,
साऱ्यांनाच कळलंय पाण्याचं मोल,
शेतकरी होऊ दे समृद्ध सखोल.