माझ्यानंतर तुला माझ्या कविताच छळतात
माझ्यानंतर तुला माझ्या कविताच छळतात
आता जर हालहवाल विचारशील,
विचारपूस खबरबात घेशील
तर एवढंच सांगेन भल्याबु-याने
सहन होतयं तोवरंच दु:खयं
ज्या दिवशी असह्य होतं,
त्या दिवशी कविताच असते
तुला कवेत घ्यावं अन् घट्ट मिठी मारावी अगदी तशीच
नेमकी हीच भानगड नकोय आपल्या कुणालाच
ना तुझ्या गटात ना माझ्या तटात
आजकाल मी ते ही सोडलयं हतबल हताश होऊन
खरं तर तुझ्या नादाला लागलो,
आणि बरंच काही सुटलं आयुष्यात तुझ्यासहीत
पण हे अति होतयं खातिर
दु:खं पाठ सोडत नाही जसं,
तशी हाताची बोटे आपोआप वळतात
कवितेकडे
पण मी हे ही ऐकलयं
माझ्यानंतर तुला माझ्या कविताच छळतात
अलिकडे

