दुरावा
दुरावा
मने जुळती सहज
जिवलग भेटता नवे वाटते जग
मग ती लग्नगाठ,अन सोहळा
सारे जण , सोयरे , होती गोळा !
पुन्हा मग संयुक्त चे विभक्त
परिवार होतो छोटा, वाटे सुखी!
मग सुरुतो तंटा, अभिमान -अपमानाचा,
सुख सरते , वैफल्य उरते, तुटती नाती
विभक्त चे मग एकल कुटुंब ,अन दुरावा
दोन दारे, दोन मने , दोन किल्ल्या अन्
विलग होती वाङनिश्चयाच्या अंगठ्या
दुरावणे कसे हे, तसे ते त्रासदायकच
जिवलगांना अन त्या निष्पाप पिल्लांनाही!