आठवण शहिदांची
आठवण शहिदांची
१०० वर्ष करून गुलामी
स्वअस्तित्व कळले रे
छातीवरती पाय देऊनी
विलायती कुत्रे भुंकले रे
व्यापाराचा बहाणा करूनी
घुसखोरी केलीस तू
भारत मातेच्या चिरंजीवांना
वीर गतीला लावलेस तू
भेटेन नऊ महिन्याने
भगतसिंगांचे शब्द झाले खरे
महात्माजींच्या सहकार्याने
वाहू लागले स्वातंत्र्याचे वारे
मंगल पांडे बाबू गेनू
सुभाषचंद्र मुकला रे
कालीचा तो अवतार घेऊनी
राणी लक्ष्मी लढली रे
मर्दा तू तोड गुलामीची चाकोली
कास स्वातंत्र्याची धरली रे
कोटी-कोटी प्रणाम वीरांना
गोरे पळवून लावले रे