STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Tragedy Action Others

2  

Anjali Bhalshankar

Tragedy Action Others

सबसे बुरे,अच्छे दिन?

सबसे बुरे,अच्छे दिन?

4 mins
70

ए हर घर तिरंगा! नुकतेच आपले,? कधीही नसणारे गोरगरीब बहुजन,व तळागाळातील या देशातील मुळ निवासी गुलाम बनवुन भांडवलदारांची चाकरी करून देशाचा इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा महासेल लावणाऱ्या माननीय पंतप्रधान महोदयांनी देशवासियांना अवाहन केले स्वातंत्र्या दिनी घराघरांवर तिरंगा फडकवावा.देशाचा ध्वज फडकविणे अर्थात अभिमानाची गोष्ट.मात्र मोदींजी तुम्हाला माहीती आहे का?आपल्या,म्हणजे तुमच्या खोट्या स्वप्नातल्या डिजिटल शायनिंग अच्छे दिन वाल्या इंडीयात कित्येक लोक रेल्वे प्लॅटफॉर्म, फुटपाथ, बसस्टॉप,महामार्ग वा पुलाच्या अडोशाला वस्ती करून रहातात. वर्षानुवर्ष बाजुच्या फुटपाथवर राहुन सिग्नलवर विविध वस्तु विकणारी मानस व त्यांची लहान मुल सुद्धा! पंधरा ऑगस्ट च्या दिवशी तिरंगा विक्री करतात त्यांनी कोणत्या घरावर आपला राष्ट्रध्वज फडकवावा हे ही सांगावे.मोदीजी तुम्ही खुप मोठी स्वप्न दाखवून सत्तेवर आलात अच्छे दिन ची पक्की मजबुत अॅडवटाईज करून देशाचे,धर्माचे,माणसांचे,मानवतेचे तुकडे करायला निघालात.नको असलेल्या व न झेपणारया त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही लादत आलात इथल्या पिचलेल्या जनतेला अजुनच मरणाच्या खाइत लोटणारा देशाचा मुखिया म्हणवणाऱ्या मोदींनी देशवादेशाच्या वारया करणयापेक्षा एकदा फकत एकदा काही मिनीटासाठी डिजीटल इंडीया तुन बाहेर यावे व गरीब झोपडपटटीतुन फीरावे ज्यांना घराघरांवर तिरंगा फडकणार आहे ती घरेही एकदा पाहून घ्यावी.करोना काळात तुम्ही बंद,अतिसुरक्षित,स्थळी बसुन मन की बात करीत,लोकांना मेणबत्त्या पेटवा नी थाळया वाजवा,असले वेडगळ सल्ले देत असताना कित्येक लोक अनवानी पायानी ऊपाशी तापाशी आपल्या मुलुक,कुटुंबाच्या ओढीने जीवाला महिमारीला घाबरून पळत होते.त्यावेळेस साधी पुरेशा रेल्वे,वा तत्सम सुविधा उपलब्ध करून न देऊ शकणारे तुमचे सरकारच्या काळात आमदार मंत्री यासाठी रात्री अपरात्री चार्टर्ड विमान सोडली जातात.सुट्टीच्या दिवशीही न्यायालयात तातडीच्या सुनावण्यात होतात.हे तुमचं आमदार जनतेवरचे प्रेम?देशाविषयीची निष्ठेबददल बोलणेच नको.अर्थमंत्री सांगत होत्या मयताचे सामान, त्याचा क्रीयाकर्म यावर टॅक्स लावला नाही म्हणजे पहा मरण कीती स्वस्त !रूपयाच मूल्यांकन ऐंशी वर पोहोचलय हे तुमचे अच्छे दिन नको आम्हाला आपले आमचे वाइट दिवसचं बरे होते .तुमच्या समस्त मंत्री मंडळ, राष्ट्रपतीची निवड, व तुमच्या मातृसंस्थेची चापलूसी करत सध्या त्यांच्या वयाला व पदाला अजिबात न शोभणारी पोरकट, वाटणारी मात्र घातक विधाने करणारे आमच्याकडे जाणुन बूजुन निर्यात केलेले महामहीम राज्यपाल याच्याविषयी लीहीणयासाठी खुप खुप पुष्कळ मुददे आहेत मात्र सध्या तुमच्या राष्ट्रभक्ती जी खोटीच व ठराविक,"लोकांच्या तालावर नाचणारी, ऊतु चाललीय ती घराघरावर तिरंगा फडकवून त्या घरामध्ये, जिथे वर्षानुवर्ष लोक घुसमटत मजबूरीने जीवन कंठत आहेत किंवा मग रस्त्याच्या कडेला मोकळया आभाळाचे छत व धरतीची कुस करून मर,मर कष्ट करून रात्रीच्या अंधारात पाठ टेकताना उद्याच्या पोटभर जेवणाची स्वप्न पहात डोळे मिटत असतात यांचे साठी काय?तिरंगा फडकवून देशाचे गुणगाण गातात गातील पूढेही कारण लाखो हुतात्मे शहीद बलीदानातून हा देश ऊभा राहीला हजारो वर्षाचा दैदीप्यमान ईतिहास मग शेकडो वर्षाच्या गुलामितून स्वतंत्रायाकडे वाटचाल करणार्या लोकांचा वारसा इथल्या प्रत्येक भारतीयांच्या मनात ठासून भरलेला आहे मग तो रस्त्यावर रहानारा गरीब कष्टकरी असो वा श्रीमंत देशहिताची, देशप्रेमाची भाषा सदविवेक बुद्धी जागृत असलेल्या प्रत्येकाला कळते.मग ते तिरंगा घरावर फडकवो अथवा मनात वंदन करो.काही फरक पडणार नाही.पंतप्रधान म्हणून तुम्ही या देशातील सत्तर टककेवर गरीब व कनिष्ट मध्यमवर्गीय म्हणून जीवन जगणाऱ्या लोकांसाठी नककी काय केले त्याचे उत्तर द्यावेच लागेल कींवा मग जनता तर पुढील निवडणुकीत ऊत्तरे देइल तोपर्यंत जेव्हडी वाट लावायचि ती लावा.कारण पंतप्रधानाच्या खुर्चीवर यासाठीच बसलात की,ठराविक लोकांच्या हितसंबंध सुरक्षित वभांडवल दार व आर एस एस च्या गटाशी भिनलेले पंतप्रधान तुम्ही नक्की कसली स्वप्न दाखवताय देशवासियांना वास्तविक पणे तुम्हाला दहशत निर्माण करायचीय मुठभर लोकांच्या सुपीक मेंदूत शिजणारया पाशवी अमानुष धर्माध जहाल नीच वृत्तीच्या कटात तुम्ही सामिल आहात त्यासाठीच तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवले त्यांच्या हातातले बाहुले बनुन आपला धर्म नावाचा खोटा शिक्का तूम्ही वाजवत आहात.कटपुतली होऊन डोळयावर पट्टी बांधुन देश बुडवत आहात.खरंतर तुम्ही आता चहा विकायला पुन्हःच प्रारंभ करायला हरकत नाही कारण जनता आता हतबल निराश झालीय वैताग आलाय तुमच्या गलिच्छ धर्मांध कपटी किळसवाण्या राजकारणाचा तुमची देशभक्ती?निष्ठा, देशप्रेम, समाज प्रेम धर्म व राष्ट्रीय भक्ती कीती व नक्की कोणावर आहे हे इथला जागरूक,पुरोगामी नी संवेदनशील माणूस जाणून आहे. तुम्ही आत्मनिर्भर व्हायला सांगताय गरिबाला, सुशिक्षित बेरोजगार युवकांना,जे नोकरीसाठी दारोदार भटकतात जीथं बर्याचदा अधी अडणाव विचारतात मग कामावर ठेवतात जी गोष्ट तुमच्या सत्तेत येण्यापासून जास्तच वाढली आहे कष्टकरी कामगारांना जे पिढ्यानपिढ्या स्वकष्टार्जित जीवन जगतात,रोज सकाळी कामगारांचे जथ्थे चौकाचौकांत दिसतील तुम्हाला ,जे लोक व्याकुळतेने कूणी येतय का काम द्यायला म्हणून वाट पहातात एखाद दुसरा गाडीवान आलाच तर झुंबड उडते नी त्या दिवशीच्या पोटाचा प्रश्न सुटतो.हे काल्पनिक नाही पंरतु तुमच्या डोक्यात नी डोळयात कल्पनेच्या, स्वप्नाच्या ,झालरी चढलेल्या आहेत.दिवसभर कष्ट करूनच रात्री अन्नाला लागलेल्या मजुराना तुम्ही कसली आत्मनिर्भरता शिकवताय ?घराघरावरच ,काय मनामनांत तिरंगा आहे त्या प्रत्येक कष्टकरी, मजुर,बेरोजगार गरीब, व्यक्तीच्या कारण त्याला माहीत आहे हे स्वतंत्र किती अनमोल आहे व ते कीती कष्ट दुःख त्याग, बलीदान, समर्पणातून मिळालेले आहे ज्याची फळे तुम्ही तुमच्या साथीदार,व एक विशिष्ट गट ज्याची हुजरेगीरी तुम्ही करत आहात नी लाखो शहिदांच्या रक्तावर पोसलेल्या स्वातंत्रावर घाला घालत सत्तेचा अतिरेकी अमानुष आयता ऊपभोग घेत आहात.मोदीजी तुम्ही व तुमची मातृसंस्था एका बाजुने महागाई व जातीभेदाच्या,खुरटलेलया रोपट्यांना खतपाणी घालून पोसत आहात दुसर्या बाजुने भांडवलदारांच्या हाती अर्थ व्यवस्था देऊन देशातील साधन संपत्ती पैसा लुबाडत आहात.अशा प्रकारे दुहेरी अत्याचार करून गोरगरीब मध्यमवर्गीय सामान्य जनतेच्या जीवावर ऊठला आहात.हे तूमचे देशप्रेम तिरंगा फडकवायचे अवाहन करणे सोपे आहे मोदीजी आमच्या गल्लीतली छोटी छोटी पोरही ज्यांना स्वातंत्र शब्दाचा अर्थही कळत नाही ती सुद्धा तिरंगा हातात घेऊन आनंदाने निरागसतेने मिरवतात.मात्र तुमचे धनी ज्यांनी इथल्या स्वातंत्र भरभरून ऊपभोगले उपभोगत आहेत मात्र तिरंगा फडकवायला त्याचे मन धजत नाही मानत नाही.संसदेत सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्तीची जबाबदारी व कर्तव्य आणि हो धर्मनिरपेक्ष वृत्ती तुमच्यात आहे का?हे अगोदर आत्मपरीक्षण करा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy